शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही! चीनने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:39 IST

सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा.

ठळक मुद्देचीन-भारत सीमा प्रश्नावर आमची भूमिका स्पष्ट आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले. दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असून काही मुद्यांवर एकमत झाले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. त्यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे.  त्यामुळेच चीनने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या या दौ-याविषयी आपण भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवणार असल्याचे चीनने म्हटले आहे. 

चीन-भारत सीमा प्रश्नावर आमची भूमिका स्पष्ट आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने मान्यता दिलेली नाही. तिथल्या वादग्रस्त भागात भारतीय नेत्यांच्या दौ-याला आमचा विरोध कायम आहे असे शिनुहा वृत्तसंस्थेने गेंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असून काही मुद्यांवर एकमत झाले आहे असे गेंग यांनी सांगितले. सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा, कटिबद्धता दाखवा अशी विनंती चीनने केली आहे. 

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारतानेही सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौ-यावर चीन नेहमीच आक्षेप नोंदवला आहे. दलाई लामा यांनी मागच्यावर्षी अरुणाचलचा दौरा केला त्यावेळी चीन प्रचंड संतापला होता. रोज चीनकडून भारताला इशारे दिले जात होते. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे.                                        

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश