शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कानडी संस्कृतीचा अभिमान व संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:38 IST

जनतेच्या मनातील बात : १ कोटींना नोकऱ्या, तरुणांना स्मार्टफोन, घराघरात पाणी व मोफत शिक्षण

मंगळूर : कानडी भाषा, संस्कृती, नृत्य, संगीत, साहित्य, लोकसंगीत व लोकसंगीत यांना प्रोत्साहन व त्यांचे संवर्धन यांचे आश्वासन असलेल्या काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यात १ कोटी लोकांना रोजगार तसेच तरुणांना स्मार्टफोन ही आश्वासने देण्यात आली आहेत. कानडी अभिमानावर भर असाच या जाहीरनाम्याचा एकूण सूर आहे.कानडी भाषेच्या विकासासाठी धारवाडमध्ये साहित्य भाषा प्राधिकरण व गदगमध्ये कानडी साहित्य व संगीत, काव्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नाट्यगृह स्थापन करण्याची घोषणाही यात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रकाशित करताना भाजपा व पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व अनेक काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.मागच्या जाहीरनाम्यात दिलेली ९५ टक्के आश्वासने आमच्या सरकारने पूर्ण केली असल्याचा दावा करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी केवळ मन की बात नावाचा कार्यक्रम करतात. आम्ही प्रत्यक्षात जनतेच्या मनातील बात जाहीरनाम्यात उतरवली आहे. मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही.या जाहिरनाम्यात द. रा. बेंद्रे, एन. के. कुलकर्णी, आर. सी. हिरेमा, डॉ. पॉल पुअप्पा, जी. पी. अमुर, गिराद्दी गोविंदराज, चन्नावीरा कनावी या साहित्यिक, लेखक तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख आवर्जून केला आहे. कानडी साहित्य-संस्कृती आणि इतिहासातील कवी, संत, साहित्यिक व अन्य मान्यवरांचा यातील उल्लेखामुळे प्रथमच पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील वेगळेपण दिसत आहे.बसवेश्वर यांचाही उल्लेखजाहीरनाम्यात बसवेश्वर यांंचाही उल्लेख आहे. त्यांच्या सर्वधर्मसमभावावर आमचा विश्वास आहे, असे त्यात म्हटले आहे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबरच कर्नाटकातील काँग्रेसचे नेते देवराज अर्स यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही विकास कार्य करीत आहोत, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.महत्त्वाचे मुद्दे : याशिवाय प्रत्येक घरात पाणी, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट, शेतकºयांच्या साह्यासाठी विशेष निधी, उत्तम दर्जाचे शिक्षण, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, अल्पसंख्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा ही आश्वासनेही काँग्रेसने मतदारांना दिली आहेत.येत्या पाच वर्षांत राज्यातील १ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले असून, सर्व तरुणांना स्मार्टफोन देण्याचेही घोषित केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाने अत्यल्प निधी परत करून कर्नाटकवर अन्याय केल्याचा उल्लेख त्यात आहे. तसेच राज्यांच्या अधिकारांवर केंद्राकडून होणाºया अतिक्रमणाचा मुद्दाही त्यात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८