शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हिल स्टेशन्सवर पर्यटकांची मास्क न लावता गर्दी, नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:03 IST

narendra modi : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मायक्रो लेव्हलवर आपल्याला अधिक कठोर पावले उचलावी लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीबाबत ईशान्यकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पर्यटन क्षेत्रात वाढती गर्दी आणि ईशान्येकडील राज्यांमधील कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण याविषयी पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. 

आपल्या आरोग्य कर्मचार्‍यांनी गेल्यावर्षीपासून अधिक मेहनत घेतली आहे. ईशान्येकडील राज्यांनी मोठ्या प्रमाणात लसीचा अपव्यय रोखला आहे. चार राज्यांमध्ये जिथे काही कमतरता दिसून येते, तेथील कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. ईशान्य राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. आपल्याला सतर्क राहावे लागेल, लोकांना सतर्क करत रहावे लागेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मायक्रो लेव्हलवर आपल्याला अधिक कठोर पावले उचलावी लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'कोरोना बहुरुपी, त्यावर लक्ष ठेवावे लागेल'पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटवर आपल्याला लक्ष ठेवाले लागेल. कोरोना हा बहुरुपी आहे, त्याचे रुप वारंवार बदलते आणि आपल्यासाठी आव्हान निर्माण करते. आम्हाला प्रत्येक व्हेरिएंटवर बारीक नजर ठेवली लागेल. कोरोनामुळे पर्यटन, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हिल स्टेशन्स, बाजारपेठेत मास्क न लावता, प्रोटोकॉलचे पालन न करता प्रचंड गर्दी जमवणे ही चिंतेची बाब आहे. हे योग्य नाही. कोरोनाची लाट येण्यापासून कसे रोखले पाहिजे, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. व्हायरस स्वतःच येत नाही, कोणीतरी जाऊन आणले तर तो येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'गर्दी न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत'कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून थांबविणे हा एक मोठा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, आपल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. तज्ज्ञ वारंवार इशाराही देत आहेत की, दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि जास्त गर्दीमुळे कोरोना संक्रमणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. प्रत्येक स्तरावर पावले उचलली पाहिजेत. गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

याचबरोबर, 'सर्वांसाठी लस, मोफत लस अभियान'ला ईशान्येकडील राज्यांत तितकेच महत्त्व आहे. तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करावी लागेल. लसीशी संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व लोकांना जोडणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पर्यटकांची जागोजागी गर्दीदुसरी लाट ओसरत असतानाच पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक पर्यटक सध्या वेगवेगळ्या पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. विशेषतः ईशान्येकडील राज्यांना पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशातील कुलु, मनालीमध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या