शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

By मोरेश्वर येरम | Updated: November 21, 2020 10:56 IST

देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले. 

ठळक मुद्देमुस्लिमांना राजकारणापासून दूर ठेवावं हाच संघचा उद्देश, ओवेसींचा आरोपबिहार विधानसभा निवडणुकी ओवेसी यांच्या पक्षाला ५ जागांवर यशसंसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व बंधनकारण असावं अशी मागणी

हैदराबादऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले. 

ओवेसी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली आहे. 'केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्द्यावर संघाचे हिंदुत्व आधारलेलं आहे. खोट्या हिंदुत्ववादी संघाच्या विरोधात आव्हान उभारण्याचं काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल', या आशयाचं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. 

ओवेसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय प्राप्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे. संसदीय निवडणुकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ओवेसी यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे. त्यात बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहेत. 

बिहारमधील पाच जागांवर मिळालेल्या यशानंतर ओवेसी यांचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर उभारी घेत असल्याचं बोललं जात आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांचं नाव मुस्लिम समाजातील सर्वात मोठे नेते म्हणून घेतलं जाऊ लागलं आहे. खरंतर एआयएमआयएम पक्षाची स्थापना १९२७ साली झाली होती. पण त्यावेळी हा पक्ष केवळ तेलंगणा पुरताच मर्यादीत होता. १९८४ पासून हैदराबादच्या लोकसभेच्या जागेवर या पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. आता या पक्षानं महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही आपलं खातं उघडलं आहे.

२०१४ सालच्या तेलंगणमधील विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला ७ जागांवर यश मिळालं होतं. तर याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही या पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. बिहारमध्ये यावेळी ५ जागांवर यश मिळवून ओवेसी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ