शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

राम मंदिरासाठी सरकारवर दबाव, शरयू नदीपाशी पुतळ्याचा योगींचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:10 AM

राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीच्या मालकीच्या वादावर जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर भाजपा, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद, तसेच संत-महंतांनी मंदिर लवकर व्हावे, यासाठी मोदी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली/लखनौ - राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीच्या मालकीच्या वादावर जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर भाजपा, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद, तसेच संत-महंतांनी मंदिर लवकर व्हावे, यासाठी मोदी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. हा क्षोभ लक्षात घेत, अयोध्येत शरयू नदीपाशी रामाचा १५१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आखली आहे.निकालास विलंब होत असल्यास केंद्राने वटहुकूम काढावा वा कायदा करावा, अशी मागणी संघ परिवारातूनच होत आहे. मोदी सरकारला साडेचार वर्षे होत आली तरी मंदिराविषयी काहीच प्रगती न झाल्याने संघ परिवार नाराज आहे. पाच राज्यांच्या विधानसभांपैकी एखाद-दुसऱ्या राज्यात फटका बसला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल, असे संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणणे त्यांना आवश्यक वाटत आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत होणाºया समारंभाला योगी आदित्यनाथ जाणार आहेत.शरयू नदीपाशी रामाचा पुतळा उभारण्यात कोणतीही अडचण नाही, असे भाजपाचे म्हणणे आहे. रामाचा १५१ मीटर उंचीचा धनुर्धारी पुतळा बांधण्याचा योगींचा मानस आहे. तो बहुधा ब्रांझचा असेल. त्याची प्रतिकृती प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी तयार केली असून, तिला योगींनी मान्यताही दिल्याचे कळते.या वादात आता बाबा रामदेवही उतरले आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर नव्हे, तर आणखी कोणाचे मंदिर उभारणार की काय, असा प्रश्न करीत, न्यायालयाच्या निकालास विलंब झाल्यास मंदिर उभारणीसाठी सरकार निश्चितच वटहुकूम आणेल, असे त्यांनी म्हटले आहे.दिल्लीत दोन दिवसांची ‘धर्मादेश’ बैठक सुरूनवी दिल्ली : २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राजधानीत शनिवारी दोनदिवसीय साधू-संतांची धर्मादेश बैठक सुरू झाली. या बैठकीत रविवारी श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक मोठे वक्ते आणि स्वत: शंकराचार्य शबरीमालाच्या वादावर विचार व्यक्त करतील. यावेळी राममंदिरावरही प्रस्ताव ठेवला जाईल.तालकटोरा स्टेडियममध्ये ‘धर्मादेश’ नावाने सुरू झालेल्या या बैठकीत देशभरातील ३ हजार साधू-संत आले आहेत. या बैठकीत हिंदू धर्मातील सर्व १२५ संप्रदायांचे संत सहभागी झाले आहेत. प्रयागराज कुंभ मेळाव्यापूर्वीची ही सर्वात मोठी गर्दी आहे.अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रनंद सरस्वती म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने संतांना निराश केले आहे. त्यामुळे या बैठकीत काही तरी मोठा निर्णय होऊ शकेल.अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत साध्वी प्राची यांनी ६ डिसेंबर रोजीच राममंदिराचा शिलान्यास केला जाईल, अशी घोषणा केली. कोणाचीही गरज नाही, राममंदिर उभे राहील, असे त्या म्हणाल्या. रविवारी बैठकीचा समारोप होईल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ