President Address : 'नव्या भारताचा उदय होत आहे', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:08 PM2022-01-25T21:08:58+5:302022-01-25T21:09:16+5:30

'दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु महामारीविरुद्ध मानवतेचा संघर्ष सुरुच आहे. या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय, पण आपण यातून वर येत आहोत.

President Ramnath Kovind address to the nation on eve of Republic day 2022 | President Address : 'नव्या भारताचा उदय होत आहे', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन

President Address : 'नव्या भारताचा उदय होत आहे', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन

googlenewsNext

नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. राष्ट्रपती म्हणाले की, 'हा प्रजासत्ताक दिन देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांचे स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. दोन दिवसांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या डिजिटल पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप सर्वसमावेशक आहे, परंतु स्वातंत्र्य, समानता या मूलभूत गोष्टी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या आहेत. मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये देखील राज्यघटनेत महत्त्वाच्या पद्धतीने नमूद केलेली आहेत. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज एक नवीन भारत उदयास येत आहे. हा एक मजबूत आणि संवेदनशील भारत आहे', असं रामनात कोविंद म्हणाले.

आल्या संबोधनात ते पुढे म्हणाले की, 'स्वच्छता मोहिमेपासून ते कोरोना लसीकरणापर्यंत, सार्वजनिक मोहिमेचे यश हे देशसेवेत देशवासी असलेल्या कर्तव्याचे प्रतिबिंब आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 1930 ते 1947 पर्यंत दरवर्षी पूर्ण स्वराज दिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच दिवस संविधानाचा पूर्ण स्वीकार म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा उपयोग काही विधायक कामासाठी करायला हवा, असे महात्मा गांधी म्हणाले होते.'

भारतात कोरोनाविरोधात सर्वात मोठी मोहिम
'आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि देशासह जगाच्या भल्यासाठी कार्य करावे अशी गांधीजींची इच्छा होती. आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु साथीच्या रोगाविरुद्ध मानवतेचा संघर्ष सुरूच आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. हा विषाणू नव्या स्वरूपात संकट निर्माण करत आहे. हे एक विलक्षण आव्हान राहिले आहे. आपल्या देशात लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि सुरुवातीच्या काळात आपल्याकडे पुरेशी संसाधने नव्हती, परंतु अशा वेळीच देशाची क्षमता चमकते. कोरोनाशी लढण्यासाठी आपण विशेष कामगिरी केली आहे आणि आता जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहोत', असं ते म्हणाले.

कोरोना काळात आपण जवळीक अनुभवली
राष्ट्रपती पुढे म्हणाले, या संकटाच्या काळात आपण सर्व देशवासी एका कुटुंबाप्रमाणे जोडलेले आहोत हे आपण सर्वांनी पाहिले आहे. सामाजिक अंतराच्या कठीण काळात आपण सर्वांनी एकमेकांशी जवळीक अनुभवली. आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत याची जाणीव झाली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स यांनी कठीण परिस्थितीत दीर्घकाळ काम करून, रुग्णांची काळजी घेण्यासाठी जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा केली. देशातील उपक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेकांनी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत आणि पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची खात्री केली आहे.

देशसेवेत योगदान देण्याचे आवाहन
ते पुढे म्हणाले, महिलांना सैन्यात कमिशन देऊन आणि एनडीएमध्ये मुलींना प्रशिक्षण देऊन देशातील महिलांचे सक्षमीकरणही राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या काळात डॉक्टर, शिपाई किंवा इतर क्षेत्रातील जबाबदारी चोखपणे पार पाडणे हीच देशाची खरी सेवा आहे. देश-विदेशात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या भारतीयांनी देशसेवेत अधिक चांगले योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: President Ramnath Kovind address to the nation on eve of Republic day 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.