शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार, राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 20:53 IST

आज जेव्हा संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, तेव्हा आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूर जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, असेही राष्ट्रपती कोवींद यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील जनतेला संबोधित केले. राष्ट्रपती म्हणाले, या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात नेहमी प्रमाणे धूम-धाम राहणार नाही. याचे कारण स्पष्ट आहे, आज संपूर्ण जग एका अशा व्हायरसचा सामना करत आहे, ज्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. एवढेच नाही, तर जवळपास सर्वच प्रकारच्या कार्यात अडथळा निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी चीनलाही कडक संदेश दिला आहे. जो अशांतता निर्माण करेल, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनी स्वातंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला चीनचे नाव न घेता सीमा वादावर भाष्य केले. आज जेव्हा संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, तेव्हा आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूर जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, असेही राष्ट्रपती कोवींद यावेळी म्हणाले.

राष्ट्रपती म्हणाले, भारत मातेचे ते पुत्र, राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जगले आणि त्यासाठीच त्यांनी आपले बलिदान दिले. संपूर्ण देश  गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन करतो. प्रत्येक भारतीय त्याच्या कुटुंबातील सदस्यांप्रती कृतज्ञ आहे. त्यांच्या शौर्याने दाखवून दिले आहे, की आमची आस्था शांततेवर आहे. पण, तरीही कुणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या आणि देशांतर्गत सुरक्षिततेसाठी अहोरात्र जागृत असणाऱ्या, आमच्या सैनिकांचा, पोलीस दलाचा आणि निमलष्करी दलाचा आम्हाला अभिमान आहे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

अयोध्येतील भूमिपूजनाचा सर्वांना अभिमान -अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात बोलताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, केवळ 10 दिवसांपूर्वीच अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीचा शुभारंभ झाला. याचा देशातील नागरिकांना अभिमान वाटतो. देशवासीयांनी दीर्घकाळ धैर्य आणि संयमाचा परिचय दिला आणि देशातील न्याय व्यवस्थेवर सदैव विश्वास ठेवला. श्रीराम जन्मभूमीशी संबंधित प्रकरणेही योग्य न्याय प्रक्रियेअंतर्गतच सोडविण्यात आले. सर्व पक्ष आणि नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मानाने स्वीकार करत शांतता, अहिंसा आणि प्रेमाचे उदाहरण संपूर्ण जगाला दाखवून दिले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.

जगासमोर उत्तम उदाहरण -राष्ट्रपती कोविंद म्हणाले, करोना महामारीवर नियंत्रण ठेवणे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यात  आपल्याला यश मिळाले आहे. हे संपूर्ण जगासमोर एक उदाहरण आहे. मोठी लोकसंख्या असेलेल्या देशात या आव्हानाचा आपण सामना करत आहोत. राज्य सरकारांनीही परिस्थितीनुसार यावर उपाययोजना केल्या. त्यांना जनतेनेही सहकार्य केलं.” 

कोरोना संकटामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना सरकारने केलेल्या मदतीवर बोलताना कोविंद म्हणाले, या महामारीचा सर्वाधिक फटका गरीब आणि दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांना बसला आहे. संकटाच्या या काळात त्यांना मदत करण्यासाठी,  तसेच व्हायरसला रोखण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतchinaचीन