शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राष्ट्रपती म्हणतात, “मला ५ लाख पगार मिळतो, त्यातला पावणे ३ लाख टॅक्स जातो, माझ्यापेक्षा जास्त तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 22:41 IST

President Ramnath Kovind News: सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे

ठळक मुद्देजेव्हा मी खासदार होतो तेव्हा झीझक रेल्वे स्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत होत्या त्या कालांतराने बंद झाल्या. कोरोनामुळे कदाचित हे झालं असावं. येणाऱ्या काळात पुन्हा या रेल्वे स्टेशनवर सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल. मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलनुसार काही अंतर आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि समस्या मला सांगू शकता.

 कानपूर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कानपूर जिल्ह्यातील त्यांच्या परौंख गावी गेले. कानपूरच्या देहात जिल्ह्यातील झीझक रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ६.१० मिनिटांनी राष्ट्रपतींची स्पेशल ट्रेन पोहचली. मी आज इथं तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटलं.

रामनाथ कोविंद म्हणाले की, या रेल्वे स्टेशनबाबत प्रत्येक आठवण ताजी आहे. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा झीझक रेल्वे स्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत होत्या त्या कालांतराने बंद झाल्या. कोरोनामुळे कदाचित हे झालं असावं. येणाऱ्या काळात पुन्हा या रेल्वे स्टेशनवर सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल. मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलनुसार काही अंतर आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि समस्या मला सांगू शकता. देशात स्वातंत्र्यानंतर बराच विकास झाला आहे. या विकासात तुम्हीही योगदान दिले आहे असं राष्ट्रपती म्हणाले.

शिक्षकांना सर्वाधिक पगार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे. ज्यातील पावणे तीन लाख करात जातात. तर वाचले किती? आणि जितके वाचले त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना आणि अन्य लोकांना मिळतो. याठिकाणी काही शिक्षक बसलेत त्यांनाही सर्वाधिक पगार आहे.

असा असेल कार्यक्रम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कानपूरला पोहोचतील आणि दुसर्‍याच दिवशी आपल्या जुन्या ओळखीच्या लोकांना भेटतील. यानंतर हेलिकॉप्टरने राष्ट्रपती त्यांच्या मूळ गावी परौंख व कस्बा पुखराया येथे जातील. त्यांच्या सन्मानार्थ तेथे २७ जून रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथून ते २७ तारखेला कानपूरला परत येतील. रात्री येथे मुक्काम केल्यानंतर ते २८ जून रोजी सकाळी आपल्या विशेष ट्रेनने लखनऊला रवाना होतील. ते दोन दिवस लखनौमध्ये थांबतील आणि २९ जून रोजी संध्याकाळी हवाई दलाच्या विमानाने दिल्लीला पोहोचतील.

तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता. भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली ते देहरादून विशेष रेल्वेने प्रवास केला होता. कोविंद यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत ही अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे. ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता. डॉ. प्रसाद यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींनी देखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. आज रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीत राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद