शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 05:19 IST

Supreme Court President news: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती.

नवी दिल्ली : राज्यपालांनी रोखलेल्या तसेच राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी ३ महिन्यांच्या आत आपला निर्णय द्यायला हवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेतामिळनाडूतील विधेयकांशी संबंधित वादावर दिले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्व राज्यपालांकरिता कालमर्यादा निश्चित केली आहे.

या खटल्याचा ४१५ पानांचा निवाडा न्यायालयाच्या वेबसाइटवर शुक्रवारी रात्री अपलोड झाला. त्यात  न्यायालयाने म्हटले की, गृहमंत्रालयाने निश्चित केलेली मर्यादा आम्हाला योग्य वाटते. राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले असेल, तर राष्ट्रपतींनी त्यावर संदर्भ प्राप्त होण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत निर्णय देणे आवश्यक आहे.वेळ लागणार असेल तर योग्य कारणांची नोंद करावी.

राज्यपालपदाला कमी लेखत नाही; पण...

आम्ही राज्यपालपदाला कोणत्याही प्रकारे कमी लेखत नाही आहोत. आमचे फक्त एवढेच म्हणणे आहे की, राज्यपालांनी सांसदीय लोकशाहीच्या स्थापित परंपरांनुसार वागायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

कायदेमंडळाचा व लोकांना जबाबदार असलेल्या लाेकनियुक्त सरकारचा योग्य सन्मान केला जायला हवा. राज्यपालांनी एक मित्र, तत्त्वचिंतक आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडायला हवी. 

मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, घटनेच्या अनुच्छेद २०० मध्ये विधेयकावर निर्णय देण्यासाठी कालमर्यादा घातलेली नाही. तथापि, अनुच्छेद २००च्या आधारे निर्णय घेण्याचे टाळून राज्यपाल विधिमंडळाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाहीत. राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक आहे.

राष्ट्रपतींना व्हेटो नाही...

न्यायालयाने म्हटले की, अनुच्छेद २०१ अन्वये राष्ट्रपतींना विधेयक नाकारण्याचा ‘अर्ध नकाराधिकार’ (पॉकेट व्हेटो) अथवा ‘पूर्ण नकाराधिकार’ (ॲब्सोल्यूट व्हेटो) नाही.

राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले असेल आणि राष्ट्रपतींनी ते राखून ठेवले असेल तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात येऊ शकते.

राज्यपालांनी एकदा परत पाठवलेले विधेयक राज्य सरकारने दुसऱ्यांदा मंजूर करून राज्यपालांकडे पाठवले असेल, तर राज्यपाल ते पुन्हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवून अडवू शकत नाहीत. 

दुसऱ्यांदा आलेल्या विधेयकास राज्यपालांनी एक महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेचे पालन न केल्यास राज्यपाल न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेत येतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूTamilnaduतामिळनाडू