शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 08:20 IST

"इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र"

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांतील नवव्या बिहार दौऱ्यात पाटणा, बस्कर आणि काराकाट मतदारसंघांतील रालोआ उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. पाटण्यातील बिक्रम येथे भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी राजद व काँग्रेसवर घणाघाती टीका केली. येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा. या लाडूत मोठे सामर्थ्य असते, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र आहे, असा घणाघात त्यांनी केला.

बिहारमध्ये लोक कंदील घेऊन फिरत आहेत. परंतु, हा कंदील केवळ एकच घर उजळवतो. आजच्या एलईडी बल्बच्या जमान्यात बिहारमध्ये एक कंदील असा आहे जो केवळ एकाच घराला प्रकाशमान करतो. या कंदिलाने बिहारमध्ये केवळ अंधारच पसरवला आहे, अशा शब्दांत मोदींनी लालू यादव यांच्या राजवटीवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी जनसमुदायाशी संवाद साधत विचारले की, भारताला कसा पंतप्रधान हवा आहे? दमदार.. देशाचे सामर्थ्य जगासमोर भक्कमपणे मांडू शकेल असा पंतप्रधान पाहिजे... दुसरीकडे इंडिया आघाडीवाले आहेत. त्यांची पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याची योजना आहे. अशा स्थितीत देशाचे काय होईल? असा प्रश्न मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४