शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

प्रसाद योजनेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अधिकारी त्र्यंबकेश्वरला दाखल

By admin | Updated: October 4, 2016 00:15 IST

त्र्यंबकेश्वर : येथे केंद्र सरकारने नुकतीच प्रसाद योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातून केवळ त्र्यंबकेश्वरचीच निवड केली आहे. प्रत्यक्षात ‘ा योजनेचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे या अधिकार्‍यांसमवेत उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर : येथे केंद्र सरकारने नुकतीच प्रसाद योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातून केवळ त्र्यंबकेश्वरचीच निवड केली आहे. प्रत्यक्षात ‘ा योजनेचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे या अधिकार्‍यांसमवेत उपस्थित होते.या अधिकार्‍यांमध्ये मुंबईहून एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, पणजी गोवा येथील आर्किटेक्ट मिलिंद रमाणी, नाशिकच्या एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे, तहसीलदार महेंद्र पवार, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विजया ल‹ा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक धनंजय तुंगार, त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त जयंत शिखरे, सत्यप्रिय शुक्ल, ललिता शिंदे, निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीकराव थेटे, सुनील अडसरे, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरूरे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तसेच नगर अभियंता प्रशांत जुन्नरे, रमेश कांगणे, एम. आर. पाटील, भिवराज घोडे, महेश बागुल आदि उपस्थित होते. तर शिवसेना त्र्यंबक प्रमुख समाधान बोडके हेही खासदारांसमवेत होते.एका तीर्थस्थळाला ४० कोटी रुपये खर्च करावयाचे असल्याने पर्यटनाला साजेसा असा विकास करावयाचा असल्याने अनेकांंनी आपापल्या परीने कामे सूचविली. बिल्वतीर्थ देवस्थानच्या मालकीचे असून, नीलपर्वताची मागची बाजू आमची असल्याने सांगून आम्ही विकासासाठी देऊ, असे सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले. त्र्यंबक नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनीही गावातील प्रसूतीगृहाजवळील जागा, एसटी प्लॅँट, अहिल्या गोदावरी संगम घाट, अहिल्या धरण परिसरातील विहंगम जागा, गंगासागर व पार्किंग स्थळ एमटीडीसीच्या माध्यमातून प्रसाद योजनेत समावेश करता येईल. तसेच ब्रšागिरी विकास दुगारवाडी, परिक्रमा मार्गावरील कुंडे, ब्रšागिरी-अंजनेरी रोप वेने जोडणे, अंजनेरी तळे सुशोभीकरण, अंजनेरी पठार (गडावर) त्र्यंबकेश्वर वाहनतळ आदि ठिकाणी हेलिपॅड तयार करणे आदि अनेक कामांचा समावेश करण्याबाबत सुचविले आहे.संतोष कदम यांनी तीर्थस्थळी पर्यटनासाठी येणार्‍या लोकांसाठी थीम पार्क, म्युझियम, दादासाहेब फाळके स्मारक, दुगारवाडी फॉल्स, बहुमजली पार्किंग, नारायण नागबलीसह इतर धार्मिक विधींसाठी जुन्या धर्तीवर स्ट्रक्चर उभारणे, माहिती केंद्रे, पक्षी अभयारण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, टेन्ट हाऊस आदि कामे सुचविली.निवृत्तिनाथ समाधी संस्थान विश्वस्त मंडळातर्फे वारकरी (शिक्षण) संस्था, प्रसादालय, दर्शनबारी, संत निवास, भक्त निवास, सभामंडप अिाद कामे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व पुंडलीकराव थेटे यांनी सुचविली. केवळ जडीबुटी, वनौषधीद्वारे दुर्धर व्याधी तसेच मुतखडा, संधिवात, लकवा, कॅन्सर, हाड मोडणे आदि बरे करीतअसेल. याबाबत लोकांना खरोखर गुण येत असेल तर अशा वैद्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल,असे एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)