शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

'दहा दिवसांत त्यांना नारळ! भाजप आणखी एका मुख्यमंत्र्याला हटवणार'; राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:08 IST

तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले; आता पाचवा बदलण्याची तयारी सुरू असल्याचा दावा

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे इशारे देत आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

भाजप आमदार विरेंद्र गुज्जर सध्या उत्तर प्रदेशातल्या शामलीमध्ये आहेत. शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खट्टर यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. शेतकऱ्यांना जशासं तसं प्रत्युत्तर देण्याची भाषा केल्यानं खट्टर यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुज्जर यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. 'खट्टर यांना आठवडाभरात, दहा दिवसांत हटवलं जाईल. कोणी कोणावर उपचार करत नाही. देशात लोकशाही आहे. तिनंच सगळ्यांचे उपचार होतात,' असं गुज्जर म्हणाले. गुज्जर यांना भाजपनं काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं आमदार केलं आहे.

कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन आणि करनालमध्ये शेतकऱ्यांवर झालेला लाठीमार यावरून खट्टर यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या हरयाणात धान्याच्या खरेदीतही उशीर होत आहे. त्यामुळेही खट्टर यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा आहे. भाजपनं गेल्या काही महिन्यांत उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री बदलले. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाची प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली.

टॅग्स :BJPभाजपा