शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नववर्षी माँ वैष्णोदेवीचं दर्शन सहज घेता येणार; प्रशासनानं आखली खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 10:40 IST

श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि प्रशासनाने भाविकांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे

जम्मू - नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतातील अनेक लोक मंदिरात दर्शनासाठी, पूजेसाठी जात असतात. त्याठिकाणी येणारं वर्ष सुख, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं अशी प्रार्थना करतात. देशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक वैष्णो देवी मंदिर. याठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी कायम राहते. परंतु नववर्षात इथं प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते. मागील वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भाविकांचा मृत्यू झाला होता. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आखला प्लॅन 

श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि प्रशासनाने भाविकांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस शिवीर कटरा आणि मुख्य भवन ६ भागात विभागणी केलीय. प्रत्येक भागात गर्दीवर नियंत्रण करण्याची रणनीती आहे. जेव्हा जेव्हा मुख्य भवनमध्ये गर्दी वाढेल तेव्हा ठिकठिकाणी भाविकांना रोखलं जाईल. यात्रेवर नजर ठेवण्यासाठी ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. 

२०२२ च्या सुरुवातीला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे. यात शिविर कटरा, बाणगंगा क्षेत्र, ताराकोट मार्ग, भैरव घाटी, माँ वैष्णोदेवी भवन हे प्रमुख भाग असतील. प्रत्येक भागात डिप्टी सीईओ स्तरावरील अधिकारी तैनात राहतील. जे त्यांच्या क्षेत्रातील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवतील.