शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होणार; भाजपकडून मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:38 IST

8th Year Modi Government Prepration for Celebration : मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी परिषद, युवा परिषद आणि मागासवर्गीयांसाठी परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच, देशातील मंदिरांमध्ये आपआपल्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय, या कार्यक्रमांमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणारे कार्यक्रम ठरवणार आहे. देशभरात कार्यक्रमांसोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या कमिटीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथवर भाजप मजबूत करण्यासाठी काम करतील.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी कमकुवत बूथ मजबूत करणे हे भाजपचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विजयंत पांडा हे भाजपच्या कमकुवत बूथ टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या देखरेखीखाली 12 नेत्यांची टीम तयार केली आहे. या संघाने कोणत्या स्तरावर काम करायचे आहे, याचा निर्णय 5 मेपर्यंत केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविला जाणार आहे. यानंतर मोदी सरकारच्या 8 वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा हे ठरवले जाईल.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे उत्सव साजरा झाला नाहीयाआधी, मोदी सरकारने गेल्या वर्षी आपल्या कार्यकाळाची 7 वर्षे पूर्ण केली, तेव्हा कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला होता. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांना सांगितले होते की, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. अशा कार्यक्रमांऐवजी राज्य सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्यात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपा