विराट कोहलीचे 18 वर्षांचे स्वप्न काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर पूर्ण झाले. आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. यावेळी विराट कोहलीलाही अश्रू अनावर झाले होते. स्टँडमध्ये अनुष्काच्या डोळ्यातही पाणी दिसले आणि आनंदाने आरसीबीच्या चाहत्यांनाही गहिवरून आले होते. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूने 18 वर्षांत पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. महत्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये विराट कोहलीची १८ वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आणि प्रेमानंद महाराज यांच्या दरबारातून असा काही चमत्कार झाला की, विराट कोहलीची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची इच्छा पूर्ण झाली.
खरे तर, विराट कोहली जेव्हा-जेव्हा कठीन परिस्थितीत सापडला, तेव्हा तेव्हा त्याला श्रद्धा आणि अध्यात्मातूनच मार्ग मिळाला आहे. विराट कठीन परिस्थितीत असताना कधी नीम करोली बाबा, कधी प्रेमानंद जी महाराज तर कधी अयोध्येतील हनुमानगढीचे हनुमान जी. या धार्मिक स्थळांना नक्की भेट देतो. त्याला त्याची पत्नी अनुष्का शर्माचीही नेहमीच साथ मिळाली आहे.
आयपीएल दरम्यानही विराट कोहली प्रेमानंद महाराज यांच्या दरबारात पोहोचला होता. गेल्या महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या 24 तास आधीही तो रेमानंद महाराजांच्या दरबारात त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्कादेखील होती. विराट कोहली आपल्या प्रत्येक सुख-दुःखाच्या वेळी वृंदावनमध्ये जाऊन प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेत असतो. आपल्या कारकिर्दीतील टेस्ट चॅप्टर संपवण्यापूर्वी आणि 18 वर्षांनंतर आयपीएल जिंकण्याचे स्वप्न घेऊन तो प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता.
चमत्कार आणि विराटचं स्वप्न पूर्ण झालं -सोशल मीडियावर लोक दावा करत आहेत की, विराटने प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेतला आण त्याच्या कारकिर्दीत आणखी एक चमत्कार दिसून आल. अर्थात, प्रेमानंद महाराजांच्या दरबारात जाण्याचा चमत्कार म्हणजे विराट कोहलीचे १८ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. आतापर्यंत विराटने आयपीएलचे विजेतेपद जिंकले नव्हते. तो गेल्या १८ वर्षांपासून आरसीबीसोबत आहे. त्याने ११ सामन्यांत ७ अर्धशतकांसह ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. विराट आणि अनुष्काने यापूर्वी जानेवारी २०२३ आणि जानेवारी २०२५ मध्येही प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती.