शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुंबईतील तीन जैन मंदिरांत प्रार्थनेस मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 02:48 IST

या निकालाकडे बोट दाखवून इतर कोणत्याही मंदिरांना किंवा जेथे खूप गर्दी होते अशा सार्वजनिक गणेशोत्सवांना अशी परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : पवित्र ‘पर्युषण पर्वा’च्या शनिवार आणि रविवार (२२ व २३ आॅगस्ट) या शेवटच्या दोन दिवशी तरी निदान भाविकांना प्रार्थना करता यावी यासाठी श्री पार्श्व तिलक श्वेतांबर मूर्तिपूजक जैन ट्रस्टला त्यांची मुंबईतील दादर, भायखळा व चेंबूर येथील मंदिरे (देरासर) उघडी ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. मात्र या निकालाकडे बोट दाखवून इतर कोणत्याही मंदिरांना किंवा जेथे खूप गर्दी होते अशा सार्वजनिक गणेशोत्सवांना अशी परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.निदान ‘पर्युषण पर्वा’त तरी भाविकांना मर्यादित संख्येने प्रवेश देण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका ट्रस्टने उच्च न्यायालयात केली होती. परंतु ‘प्रत्येकाने व्यक्तिगत धार्मिक कर्तव्याहून अधिक व्यापक अशा सामाजिक कर्तव्याचे भान ठेवायला हवे. मनामनात परमेश्वर आहे, त्याची अशा वेळी पूजा करावी’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने ‘पर्युषण पर्व’ सुरू होण्याच्या आदल्या दिवशी परवानगी नाकारली होती. त्याविरुद्ध केलेल्या अपिलात सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे परवानगी दिली. मात्र यासाठी कोरोनाचे सर्व निर्बंध कसोशीने पाळण्याची अट घातली गेली.ट्रस्टच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले की, आम्ही काही फार मोठी गर्दी जमविण्यास परवानगी मागत नाही. दोन दिवसांत फार तर दोन-अडीचशे भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. सरकारने आता मॉल, केशकर्तनालये व मद्याची दुकानेही उघडायला परवानगी दिली आहे. तेथील गर्दीवर सरकार कसे नियंत्रण ठेवणार आहे?ट्रस्टच्या विनंतीस महाराष्ट्र सरकारच्या वतीने तीव्र विरोध करताना ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकार ती आटोक्यात ठेवण्यासाठी निकराने प्रयत्न करीत आहे व लोकही चांगले सहकार्य करीत आहेत. अशी एकाला परवानगी दिली की उद्या गणेशोत्सवालाही परवानगी मागितली जाईल. त्याने परिस्थिती आणखीनच बिकट होईल.मात्र सरन्यायाधीश न्या. बोबडे म्हणाले की, आता यांना परवानगी दिली तरी जेथे अतोनात व अनियंत्रित गर्दी होते अशा गणेशोत्सवाच्या वेळी याकडे पायंडा म्हणून बोट दाखविता येणार नाही. त्यामुळे ट्रस्ट जर एका वेळी फक्त पाच भाविकांना प्रवेश देऊ, असे म्हणत असेल तर तसे करण्यास काही हरकत आहे, असे आम्हाला वाटत नाही.सरन्यायाधीश असेही म्हणाले की, सरकारचे वागणे आम्हाला विचित्र वाटते. जेथे आर्थिक हित गुंतलेले असते तेथे ते धोका पत्करायला तयार असतात. पण धार्मिक सणांच्या वेळी मात्र ते धोक्याचा बागुलबुवा पुढे करतात.>‘परमेश्वर आम्हाला माफ करेल’सरसकट बंदी घालणे योग्य नाही, असे सांगून न्यायालयाने याआधी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून ओडिशामधील जगन्नाथ यात्रेलाही परवानगी दिली होती, याचा सरन्यायाधीशांनी संदर्भ दिला. ते म्हणाले, त्यावेळी भगवान जगन्नाथाने आम्हाला माफ केले. आता तुमचा (जैन) परमेश्वरही माफ करेल, याची खात्री आहे!