शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील तीन जैन मंदिरांत प्रार्थनेस मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 02:48 IST

या निकालाकडे बोट दाखवून इतर कोणत्याही मंदिरांना किंवा जेथे खूप गर्दी होते अशा सार्वजनिक गणेशोत्सवांना अशी परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : पवित्र ‘पर्युषण पर्वा’च्या शनिवार आणि रविवार (२२ व २३ आॅगस्ट) या शेवटच्या दोन दिवशी तरी निदान भाविकांना प्रार्थना करता यावी यासाठी श्री पार्श्व तिलक श्वेतांबर मूर्तिपूजक जैन ट्रस्टला त्यांची मुंबईतील दादर, भायखळा व चेंबूर येथील मंदिरे (देरासर) उघडी ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. मात्र या निकालाकडे बोट दाखवून इतर कोणत्याही मंदिरांना किंवा जेथे खूप गर्दी होते अशा सार्वजनिक गणेशोत्सवांना अशी परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.निदान ‘पर्युषण पर्वा’त तरी भाविकांना मर्यादित संख्येने प्रवेश देण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका ट्रस्टने उच्च न्यायालयात केली होती. परंतु ‘प्रत्येकाने व्यक्तिगत धार्मिक कर्तव्याहून अधिक व्यापक अशा सामाजिक कर्तव्याचे भान ठेवायला हवे. मनामनात परमेश्वर आहे, त्याची अशा वेळी पूजा करावी’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने ‘पर्युषण पर्व’ सुरू होण्याच्या आदल्या दिवशी परवानगी नाकारली होती. त्याविरुद्ध केलेल्या अपिलात सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे परवानगी दिली. मात्र यासाठी कोरोनाचे सर्व निर्बंध कसोशीने पाळण्याची अट घातली गेली.ट्रस्टच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले की, आम्ही काही फार मोठी गर्दी जमविण्यास परवानगी मागत नाही. दोन दिवसांत फार तर दोन-अडीचशे भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. सरकारने आता मॉल, केशकर्तनालये व मद्याची दुकानेही उघडायला परवानगी दिली आहे. तेथील गर्दीवर सरकार कसे नियंत्रण ठेवणार आहे?ट्रस्टच्या विनंतीस महाराष्ट्र सरकारच्या वतीने तीव्र विरोध करताना ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकार ती आटोक्यात ठेवण्यासाठी निकराने प्रयत्न करीत आहे व लोकही चांगले सहकार्य करीत आहेत. अशी एकाला परवानगी दिली की उद्या गणेशोत्सवालाही परवानगी मागितली जाईल. त्याने परिस्थिती आणखीनच बिकट होईल.मात्र सरन्यायाधीश न्या. बोबडे म्हणाले की, आता यांना परवानगी दिली तरी जेथे अतोनात व अनियंत्रित गर्दी होते अशा गणेशोत्सवाच्या वेळी याकडे पायंडा म्हणून बोट दाखविता येणार नाही. त्यामुळे ट्रस्ट जर एका वेळी फक्त पाच भाविकांना प्रवेश देऊ, असे म्हणत असेल तर तसे करण्यास काही हरकत आहे, असे आम्हाला वाटत नाही.सरन्यायाधीश असेही म्हणाले की, सरकारचे वागणे आम्हाला विचित्र वाटते. जेथे आर्थिक हित गुंतलेले असते तेथे ते धोका पत्करायला तयार असतात. पण धार्मिक सणांच्या वेळी मात्र ते धोक्याचा बागुलबुवा पुढे करतात.>‘परमेश्वर आम्हाला माफ करेल’सरसकट बंदी घालणे योग्य नाही, असे सांगून न्यायालयाने याआधी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून ओडिशामधील जगन्नाथ यात्रेलाही परवानगी दिली होती, याचा सरन्यायाधीशांनी संदर्भ दिला. ते म्हणाले, त्यावेळी भगवान जगन्नाथाने आम्हाला माफ केले. आता तुमचा (जैन) परमेश्वरही माफ करेल, याची खात्री आहे!