शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

करणीसेनेच्या धमकीनंतर प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून प्रसून जोशींची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 15:36 IST

प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रशून जोशी यांनी माघार घेतली आहे.

जयपूर- प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रशून जोशी यांनी माघार घेतली आहे. पद्मावत सिनेमावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसून जोशी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. करणी सेनेकडून हल्ला होण्याची भिती असल्याने त्यांनी प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सव अर्थात जयपूर लिटरेचर फेस्टिवलला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्यिकांच्य या महोत्सवात आपल्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये. तसंच वादावर लक्ष केंद्रीत राहण्यापेक्षा महोत्सवातील नवनिर्मितीवर लक्ष केंद्रीत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करत प्रसून जोशी यांनी जयपूर साहित्य महोत्सवातून माघार घेतली आहे. 

अतिशय जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयामुळे मला यंदा साहित्य आणि कवितांच्या या गंगेमध्ये डुंबता येणार नाही, याचं मला दुःख होत आहे, असं प्रसून जोशी म्हणाले. 

 

पद्मावत सिनेमावरुन वाद निर्माण झाल्यानंतरही हा सिनेमा प्रदर्शित करण्याला प्रसून जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं असून माझा निर्णय दोन्ही बाजूंना न्याय देणारा होता. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, असं पद्मावतला हिरवा झेंडा दाखविण्याच्या निर्णयावर प्रसून जोशी यांनी मत व्यक्त केलं होतं. राजपूत संघटनांकडून प्रसून जोशी यांना जयपूर साहित्य महोत्सवात सहभागी न होण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करत झेड सुरक्षा प्रदान केली होती. पण, आता प्रसून जोशी यांनी या महोत्सवाला हजेरीच न लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Prasoon joshiप्रसून जोशीPadmavatपद्मावत