शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:30 IST

देशाला नष्ट करण्याचं काम शत्रु करू शकले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल यांनी येथे केला होता.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सोमवारी देशातील एकतेसाठी राजधानी दिल्लीत सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उपस्थिती होती. 

देशाच्या संविधानावर मोदी सरकारला हल्ला करू देणार नाही, असं राहुल गांधी यांनी यावेळी खडासवून सांगितले. राहुल यांनी एनआरसीवरून घेतलेल्या भूमिकेनंतर जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी राहुल यांचे कौतुक करत आभार मानले. 

एनआरसी कायद्याविरोधातील सत्याग्रह आंदोलनात सामील तुम्ही झालात. नागरिकता संशोधन कायदा तुम्ही काँग्रेसशासित राज्यात लागू होऊ देणार नाही यावर आम्हाला विश्वास असल्याचे प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले. या कायद्याविरोधात जनआंदोलनाची गरज आहेच. या व्यतिरिक्त आपल्याला अशा राज्य सरकारची गरज आहे, जिथे हा कायदा लागू होणार नाही. आशा आहे की, तुम्ही काँग्रेसशासित राज्यात तुम्ही हा कायदा लागू होऊ देणार नाहीत, असंही किशार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजघाटवर सोमवारी सत्याग्रह आंदोलन पार पडले. देशाला नष्ट करण्याचं काम शत्रु करू शकले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल यांनी येथे केला होता. तुम्ही भारत मातेचा आवाज दाबू शकणार नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.