शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

UP Election 2022: “राहुल गांधी हे प्रियंका गांधींना यूपीत काँग्रेसचा चेहरा बनवू इच्छित नव्हते”: प्रशांत किशोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:07 IST

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) तयारीने आणखी थोडा वेग घेतला आहे.

लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) तयारीने आणखी थोडा वेग घेतला असून, राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे परिस्थिती कठीण होत चालल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. यातच राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) आता काँग्रेससोबत आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे लखीमपूर घटनेनंतर आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उत्तर प्रदेशच्या राजकारण अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच सन २०१७ रोजी झालेल्या निवडणुकांवेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांना काँग्रेसचा चेहरा बनवण्यास तयार नव्हते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.  

एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसच्या ऑफरबाबत सुरुवातीला साशंक होतो. यासाठी माझ्या सहकार्यांकडून सल्लाही घेतला होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला, तर त्यातून प्रचंड यश काही नसेल. तीन महिने उत्तर प्रदेशचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर काँग्रेससमोर प्लान सादर केला. मात्र, सुरुवातीला राहुल गांधी काही गोष्टींसाठी तयार नव्हते. काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला, अशी आठवण प्रशांत किशोर यांनी सांगितली.  

प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवायचे होते

माझ्या प्लाननुसार प्रियंका गांधी यांना काँग्रेसचा चेहरा बनवायचे होते आणि सोनिया गांधी निवडणूक कॅम्पेन लॉंच करतील, अशी रणनीती होती. तीन महिने यावर खूप चर्चा झाली आणि अखेर माझे म्हणणे त्यांना पटले. सुरुवातीला काँग्रेसने चांगले वातावरण तयार केले होते. मात्र, समाजवादी पक्षासह केलेली आघाडी सर्वाधिक नुकसानकारक ठरली, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी व्हावी, असे मला कधीच वाटले नाही. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे पडले की, सपासोबत निवडणुकीत उतरल्यास मोठा फायदा होऊ शकेल. मात्र, म्हणून मी काँग्रेसपासून लांब गेलो किंवा दूर झालो नाही, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.  

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण