शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अखेर तारीख ठरली! प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 14:49 IST

prashant kishor : प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल. 

पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथील पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. प्रशांत किशोर २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंतीदिनी अधिकृतपणे एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. 

प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण बिहार पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनेक सभा घेऊन त्यांनी बिहारमधील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर ते आता बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल. 

प्रशांत किशोर यांची मुख्य ओळख निवडणूक रणनीतीकार अशी आहे. मात्र, २०२१ मध्ये ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जाहीर केले होते की, ते यापुढे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. २ ऑक्टोबर २०२२ रोजी औपचारिकपणे राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहारमध्ये यात्रा काढण्याची घोषणा केली होती. 

पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी जनसुराजची स्थापना केली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पश्चिम चंपारण्य भागातून आपल्या यात्रेस सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी आजतागायत पाच हजार किमी चालल्याचा दावा केला आहे. त्यांनी बिहारचे १४ जिल्हे चालून, तर १० जिल्हे वाहनाने पिंजून काढले आहेत. यानंतर आता प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमधील सर्व २४३ जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशांत किशोर हे मुस्लिम मतांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ७५ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच, आपल्या मुलांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा, असे आवाहन प्रशांत किशोर बिहारमधील जनतेला करताना दिसतात. खासकरून दलित आणि मुस्लिमांनी जात आणि धर्माच्या आधारावर मतदान करू नये, असेही आवाहन प्रशांत किशोर यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, बिहारच्या राजकारणामध्ये १९९० पासूनच सामाजिक न्यायाचा मुद्दा प्रभावी राहिला आहे. त्यातून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी, तसेच विद्यमान मुख्यमंत्री व जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांचा उदय झाल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही फारसे सुधारलेले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी जेडीयूमधून आपली राजकीय इनिंग सुरू केली होती. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये क्रमांक दोनचे स्थान दिले, पण लवकरच ते दोघेही वेगळे झाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार