शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:59 IST

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

नवी दिल्ली- 

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Election Result 2022) अभूतपूर्व विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक 'आप'बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात भारतीय जनता पक्षाचा (BJP) मुकाबला करण्यासाठी 'आप'ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात.

प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच दाखवलीएका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आपल्या वक्तव्यासोबत आकडेवारीही मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण २७ लाख मतं मिळाली होती. या देशात कोणत्याही पक्षाचं सरकार बनवायचं किंवा देश जिंकायचा असेल तर २० कोटींहून अधिक मतांची गरज आहे. एवढी मतं मिळविण्यासाठी केवळ काही वर्षे पुरेशी नसतील. कोणत्याही पक्षाला या पदावर यायला अनेक दशकं लागतात, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

'आप'ला १५-२० वर्षे लागतील'आप'ला भाजपला टक्कर देण्यासाठी बराच काळ द्यावा लागेल. यास 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. एका रात्रीत काहीही होऊ शकत नाही. एक किंवा दोन राज्य जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणूक जिंकणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

फक्त काँग्रेस आणि भाजप हे पॅन इंडिया पक्ष"तत्वतः कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची श्रेणी मिळू शकते. पण लोकसभा निवडणूक जिंकणं ही वेगळी बाब आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष पॅन इंडिया पक्ष बनले आहेत. इतर कोणत्याही पक्षाला असं स्थान मिळवता आलेलं नाही. असं करण्यासाठी किमान १५-२० वर्षे प्रयत्न करावे लागतील", असेही ते म्हणाले. एवढा मोठा बदल रातोरात होत नाही. भाजपा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत यायला पक्षाला ५० वर्षे लागली. भाजपने १९७८ मध्ये प्रयत्न सुरू केले आणि अनेक वर्षांनी युतीनं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मतं२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १७.१६ कोटी मतं मिळाली होती. पण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी वाढली. २०१९ च्या लोकसभेत ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला एकूण २२.९० कोटी मतं मिळाली. २०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश (४.२८ कोटी), पश्चिम बंगाल (२.३० कोटी), मध्य प्रदेश (२.१४ कोटी), राजस्थान (१.९० कोटी), गुजरात (१.८० कोटी) आणि महाराष्ट्रात (१.४९ कोटी) मतं मिळाली. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल