शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:59 IST

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

नवी दिल्ली- 

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Election Result 2022) अभूतपूर्व विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक 'आप'बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात भारतीय जनता पक्षाचा (BJP) मुकाबला करण्यासाठी 'आप'ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात.

प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच दाखवलीएका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आपल्या वक्तव्यासोबत आकडेवारीही मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण २७ लाख मतं मिळाली होती. या देशात कोणत्याही पक्षाचं सरकार बनवायचं किंवा देश जिंकायचा असेल तर २० कोटींहून अधिक मतांची गरज आहे. एवढी मतं मिळविण्यासाठी केवळ काही वर्षे पुरेशी नसतील. कोणत्याही पक्षाला या पदावर यायला अनेक दशकं लागतात, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

'आप'ला १५-२० वर्षे लागतील'आप'ला भाजपला टक्कर देण्यासाठी बराच काळ द्यावा लागेल. यास 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. एका रात्रीत काहीही होऊ शकत नाही. एक किंवा दोन राज्य जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणूक जिंकणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

फक्त काँग्रेस आणि भाजप हे पॅन इंडिया पक्ष"तत्वतः कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची श्रेणी मिळू शकते. पण लोकसभा निवडणूक जिंकणं ही वेगळी बाब आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष पॅन इंडिया पक्ष बनले आहेत. इतर कोणत्याही पक्षाला असं स्थान मिळवता आलेलं नाही. असं करण्यासाठी किमान १५-२० वर्षे प्रयत्न करावे लागतील", असेही ते म्हणाले. एवढा मोठा बदल रातोरात होत नाही. भाजपा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत यायला पक्षाला ५० वर्षे लागली. भाजपने १९७८ मध्ये प्रयत्न सुरू केले आणि अनेक वर्षांनी युतीनं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मतं२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १७.१६ कोटी मतं मिळाली होती. पण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी वाढली. २०१९ च्या लोकसभेत ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला एकूण २२.९० कोटी मतं मिळाली. २०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश (४.२८ कोटी), पश्चिम बंगाल (२.३० कोटी), मध्य प्रदेश (२.१४ कोटी), राजस्थान (१.९० कोटी), गुजरात (१.८० कोटी) आणि महाराष्ट्रात (१.४९ कोटी) मतं मिळाली. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल