शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:59 IST

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

नवी दिल्ली- 

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Election Result 2022) अभूतपूर्व विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक 'आप'बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात भारतीय जनता पक्षाचा (BJP) मुकाबला करण्यासाठी 'आप'ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात.

प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच दाखवलीएका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आपल्या वक्तव्यासोबत आकडेवारीही मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण २७ लाख मतं मिळाली होती. या देशात कोणत्याही पक्षाचं सरकार बनवायचं किंवा देश जिंकायचा असेल तर २० कोटींहून अधिक मतांची गरज आहे. एवढी मतं मिळविण्यासाठी केवळ काही वर्षे पुरेशी नसतील. कोणत्याही पक्षाला या पदावर यायला अनेक दशकं लागतात, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

'आप'ला १५-२० वर्षे लागतील'आप'ला भाजपला टक्कर देण्यासाठी बराच काळ द्यावा लागेल. यास 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. एका रात्रीत काहीही होऊ शकत नाही. एक किंवा दोन राज्य जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणूक जिंकणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

फक्त काँग्रेस आणि भाजप हे पॅन इंडिया पक्ष"तत्वतः कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची श्रेणी मिळू शकते. पण लोकसभा निवडणूक जिंकणं ही वेगळी बाब आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष पॅन इंडिया पक्ष बनले आहेत. इतर कोणत्याही पक्षाला असं स्थान मिळवता आलेलं नाही. असं करण्यासाठी किमान १५-२० वर्षे प्रयत्न करावे लागतील", असेही ते म्हणाले. एवढा मोठा बदल रातोरात होत नाही. भाजपा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत यायला पक्षाला ५० वर्षे लागली. भाजपने १९७८ मध्ये प्रयत्न सुरू केले आणि अनेक वर्षांनी युतीनं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मतं२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १७.१६ कोटी मतं मिळाली होती. पण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी वाढली. २०१९ च्या लोकसभेत ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला एकूण २२.९० कोटी मतं मिळाली. २०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश (४.२८ कोटी), पश्चिम बंगाल (२.३० कोटी), मध्य प्रदेश (२.१४ कोटी), राजस्थान (१.९० कोटी), गुजरात (१.८० कोटी) आणि महाराष्ट्रात (१.४९ कोटी) मतं मिळाली. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल