शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:30 IST

ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे INDIA आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Prashant Kishor on India Alliance: सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा देत इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निर्णयावर आता निवडणूक रणनितीकार आणि 'जन सूराज'चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

आघाडीचे पुढे काहीही होणार नाहीमीडियाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, मी गेल्या 6-7 महिन्यांपासून सांगतोय. ज्याला तुम्ही इंडिया आघाडी म्हणता, त्यात बसलेले सर्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, या सर्वांना मुख्यमंत्री बनवण्याचे अभियान मी सुरू केले होते. त्यांच्या विजयात माझा मोठा वाटा आहे, मी त्या सर्व लोकांना खुप चांगलं ओळखतो. त्यामुळेच मी म्हणत आलोय की, या इंडिया आघाडीचे पुढे काहीही होणार नाही. हे सर्वजण आपापले राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडिया आघाडीत समानता नाहीपीके पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकसूत्रता नाही, एकमेकांना मदत करण्याची इछा नाही. या आघाडीतून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही बंगालबद्दल बोलता, बिहारमध्ये आघाडी झाली का, हे आधी सांगा. ज्या राज्यात इंडिया आघाडीची सुरुवात झाली, त्या राज्यात नितीश कुमार आघाडीबाबत स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. 

एनडीएबाबत म्हणाले...एनडीएबाबत प्रशांत किशोर यांना विचारले असता ते म्हणाले की, एनडीएमध्ये सर्व काही एका व्यक्तीच्या नावावर आहे. ते व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते जे काही सांगतात, तेच होते. त्यांच्यापुढे ज्या इंडिया आघाडीची कल्पना केली जात आहे, त्याची पहिली बैठक बिहारच्या पाटणा येथे झाली. त्यानंतर सर्वप्रथम बिहारमधील जागावाटप जाहीर व्हायला हवे होते, पण तसे आजपर्यंत झालेले नाही, असंही पीके यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा