शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Prashant Kishor: “काँग्रेसमुळे माझे खूप नुकसान, तो पक्ष कधीच सुधारणार नाही”; प्रशांत किशोर यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 20:30 IST

Prashant Kishor: गेल्या १० वर्षांत काँग्रेससोबत ११ निवडणुकांमध्ये काम केले असून, यापुढे काम करणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

हाजीपूर: देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव झालेल्या काँग्रेसमध्ये आताच्या घडीला मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चिंतन शिबिरानंतर पक्षात नाराजांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेनेही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यसभा निवडणुकीवरूनही काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. तर दुसरीकडे हार्दिक पटेल १५०० समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यातच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनीही काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेसमुळे माझे खूप नुकसान झाले. माझे रेकॉर्ड खराब झाले, त्या पक्षात कधी सुधारणार होईल असे वाटत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये हाजीपूर येथे प्रशांत किशोर बोलत होते. प्रशांत किशोर यांनी काही मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे नाकारले. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे खूप नुकसान झाले. हा पक्ष म्हणजे बुडते जहाज आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. 

या पराभवानंतर खूप काही शिकलो

आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे रेकॉर्ड खराब झाले. हा पक्ष स्वत:मध्ये सुधारणा करत नाही. त्यामुळे हा पक्ष आमचेही नुकसान करेल. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र सध्या काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मी २०११ ते २०२१ या काळात एकूण ११ निवडणुकांमध्ये काम केले. यामध्ये एका निवडणुकीसाठी मी यांच्यासोबत काम केले आणि ही निवडणूक हारलो. त्यामुळे मी तेव्हापासूनच ठरवले होते की, यापुढे काँग्रेससोबत काम करणार नाही. मात्र या पराभवानंतर मी खूप काही शिकलो, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, काही विषयांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचे किशोर यांनी ट्विट करुन सांगितले होते. पक्षप्रवेश नाकारताना त्यांनी काँग्रेसला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामूहिकपणे दूर करणे आवश्यक असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले होते.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस