शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशांत भूषण यांनी चूक केल्याची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:03 IST

एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीच्या संदर्भात केलेल्या ट्विटवरून अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली.

नवी दिल्ली : ‘सीबीआय’च्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीच्या संदर्भात केलेल्या टष्ट्वीटवरून अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली. ती लक्षात घेऊन वेणुगोपाळ यांनी अवमानना याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, ती मान्य करून प्रकरण लगेच निकाली न काढता त्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या मुद्यांवर आपण निकाल देऊ, असे सूचित केले.न्या. अरुण मिश्रा व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण आले तेव्हा भूषण यांनी संबंधित टष्ट्वीट करण्यात आपल्याकडून चूक झाल्याचे प्रांजळपणे कबूल केले. मात्र, या सुनावणीतून न्या. मिश्रा यांनी बाजूला राहावे, असा अर्ज त्यांनी केला. असा अर्ज केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासही त्यांनी नकार दिला. भूषण यांनी चूक कबूल केल्याने हे प्रकरण संपवावे, या भूमिकेवर वेणुगोपाळ ठाम राहिले. न्यायप्रविष्ट प्रकरणात सहभागी असलेल्या वकिलाने टीकाटिप्पणी करण्याला पायबंद करता येईल का, यावर ३ एप्रिल रोजी न्यायालय विचार करणार आहे.>दिशाभूल केल्याचे केले होते टष्ट्वीटनागेश्वर राव यांच्या नेमणुकीचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनेच घेतल्याचे सांगून अटर्नी जनरलनी त्या बैठकीचे इतिवृत्त प्रशांत भूषण यांनीच दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयात सादर केले होते. त्यादिवशीचे कामकाज संपल्यावर प्रशांत भूषण यांनी अटर्नी जनरलनी कदाचित बनावट इतिवृत्त सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली असावी, असे टष्ट्वीट केले होते. त्यावरून वेणुगोपाळ यांनी ही अवमानना याचिका केली आहे.