शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

प्रशांत भूषण यांनी चूक केल्याची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:03 IST

एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीच्या संदर्भात केलेल्या ट्विटवरून अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली.

नवी दिल्ली : ‘सीबीआय’च्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीच्या संदर्भात केलेल्या टष्ट्वीटवरून अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली. ती लक्षात घेऊन वेणुगोपाळ यांनी अवमानना याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, ती मान्य करून प्रकरण लगेच निकाली न काढता त्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या मुद्यांवर आपण निकाल देऊ, असे सूचित केले.न्या. अरुण मिश्रा व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण आले तेव्हा भूषण यांनी संबंधित टष्ट्वीट करण्यात आपल्याकडून चूक झाल्याचे प्रांजळपणे कबूल केले. मात्र, या सुनावणीतून न्या. मिश्रा यांनी बाजूला राहावे, असा अर्ज त्यांनी केला. असा अर्ज केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासही त्यांनी नकार दिला. भूषण यांनी चूक कबूल केल्याने हे प्रकरण संपवावे, या भूमिकेवर वेणुगोपाळ ठाम राहिले. न्यायप्रविष्ट प्रकरणात सहभागी असलेल्या वकिलाने टीकाटिप्पणी करण्याला पायबंद करता येईल का, यावर ३ एप्रिल रोजी न्यायालय विचार करणार आहे.>दिशाभूल केल्याचे केले होते टष्ट्वीटनागेश्वर राव यांच्या नेमणुकीचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनेच घेतल्याचे सांगून अटर्नी जनरलनी त्या बैठकीचे इतिवृत्त प्रशांत भूषण यांनीच दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयात सादर केले होते. त्यादिवशीचे कामकाज संपल्यावर प्रशांत भूषण यांनी अटर्नी जनरलनी कदाचित बनावट इतिवृत्त सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली असावी, असे टष्ट्वीट केले होते. त्यावरून वेणुगोपाळ यांनी ही अवमानना याचिका केली आहे.