शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:13 IST

'माझ्यापेक्षा अधिक योग्यता आणि पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी दुर्लक्षित केल्याची तक्रार करण्यासाठी प्रणव मुखर्जींकडे अनेक कारणे आहेत, पण त्यावेळी माझ्याकडे कोणताच पर्याय नसल्याची त्यांना कल्पना होती. यामुळेच आमच्या संबंधात काही फरक पडला नाही', असं मनमोहन सिंग बोलले आहेत.

ठळक मुद्देमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ पुस्तकाचं प्रकाशनपंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते असा खुलासा मनमोहन सिंग यांनी यावेळी केलाया सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते

नवी दिल्ली - पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. 'माझ्यापेक्षा अधिक योग्यता आणि पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी दुर्लक्षित केल्याची तक्रार करण्यासाठी प्रणव मुखर्जींकडे अनेक कारणे आहेत, पण त्यावेळी माझ्याकडे कोणताच पर्याय नसल्याची त्यांना कल्पना होती. यामुळेच आमच्या संबंधात काही फरक पडला नाही', असं मनमोहन सिंग बोलले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोअॅलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. मनमोहन सिंह यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

'2004 रोजी जेव्हा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी माझी निवड केली, तेव्हा प्रणव मुखर्जी माझ्या प्रतिष्ठित सहका-यांपैकी एक होते. पंतप्रधान होण्यासाठी ते अधिक पात्र होते, आणि याची तक्रार करण्याचं प्रत्येक कारण त्यांच्याकडे होते. पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता याचीही त्यांनी कल्पना होता', असा खुलासा मनमोहन सिंग यांनी केला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

'प्रणव मुखर्जी हे ठरवून राजकारणात आले आहेत. देशातील एक सर्वोत्तम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण मी अपघाताने राजकारणात आलो. पी व्ही नरसिंह राव यांनी मला अर्थमंत्री बनण्याची ऑफर दिली आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरु झाला', असं मनमोहन सिंग बोलले आहेत. यावेळी मनमोहन सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांचंही कौतुक केलं. युपीए सरकार व्यवस्थित चालण्याचं श्रेय प्रणव मुखर्जींचं असल्याचंही मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मात्र यावेळी कोणतंही भाषण केलं नाही. 

प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान कोणाला बनवण्यात येणार यावरुन  पक्षात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. 'सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर माझी निवड करण्यात येईल अशी अपेक्षा होती. सरकारमधील माझा दिर्घ अनुभव लक्षात घेता मला पंतप्रधानपद केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती', असंही त्यांनी सांगितलं आहे. 

‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी 1996च्या संयुक्त मोर्चा सरकारपासून यूपीए-2च्या कार्यकाळापर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला कम्युनिस्ट पक्षाचे नेते  सीताराम येचुरी, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह यूपीएतील अनेक नेते उपस्थित होते. सिताराम येचुरी यांनी प्रणव मुखर्जींचं कौतुक करताना हत्तीप्रमाणे स्मरणशक्ती असल्याचं म्हटंल. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस