शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

भारताची वाटचाल बाल्कनायझेशनच्या दिशेने, प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:03 IST

भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोलकाता - भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता येथे एका मुलाखतीत भारताची वाटचाल आता बाल्कनायझेशनच्या दिशेने सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

(बाल्कनायझेशन म्हणजे काय ?- दुस-या महायुद्धानंतर युरोपातील बाल्कन प्रदेशात विविध नवे देश तयार होण्याच्या प्रक्रियेला बाल्कनायझेशन म्हणतात.)भरकटलेली अर्थव्यवस्था, मंदावलेली आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मिती होण्यास आलेले अपयश अशा गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विभाजनाच्या राजकारणाचा वापर केला जातो, याबाबत प्रणव मुखर्जी यांनी आपले मत व्यक्त केले. देशाचे तीन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, पी.चिदंबरम, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सामाजिक व राजकीय स्थितीबाबत मत व्यक्त केले आहे.

भारताच्या सध्याच्या स्थितीत आता काय केले पाहिजे?, असे विचारताच मुखर्जी यांनी हाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे, असे उत्तर दिले. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुखर्जी आपली मते व विचार जाहीर प्रकट करत राहतील असे त्यांच्या या विधानांवरुन वाटते. 14 ऑक्टोबरला प्रणव मुखर्जी अलिगड मुस्लिम विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत तर नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथे विधान ट्रस्टने इंदिरा गांधी मेमोरियल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील तसेच डिसेंबरमध्ये जादवपूर विद्यापीठात ते व्याख्यान देणार आहेत.