शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भारताची वाटचाल बाल्कनायझेशनच्या दिशेने, प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:03 IST

भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोलकाता - भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता येथे एका मुलाखतीत भारताची वाटचाल आता बाल्कनायझेशनच्या दिशेने सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

(बाल्कनायझेशन म्हणजे काय ?- दुस-या महायुद्धानंतर युरोपातील बाल्कन प्रदेशात विविध नवे देश तयार होण्याच्या प्रक्रियेला बाल्कनायझेशन म्हणतात.)भरकटलेली अर्थव्यवस्था, मंदावलेली आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मिती होण्यास आलेले अपयश अशा गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विभाजनाच्या राजकारणाचा वापर केला जातो, याबाबत प्रणव मुखर्जी यांनी आपले मत व्यक्त केले. देशाचे तीन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, पी.चिदंबरम, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सामाजिक व राजकीय स्थितीबाबत मत व्यक्त केले आहे.

भारताच्या सध्याच्या स्थितीत आता काय केले पाहिजे?, असे विचारताच मुखर्जी यांनी हाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे, असे उत्तर दिले. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुखर्जी आपली मते व विचार जाहीर प्रकट करत राहतील असे त्यांच्या या विधानांवरुन वाटते. 14 ऑक्टोबरला प्रणव मुखर्जी अलिगड मुस्लिम विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत तर नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथे विधान ट्रस्टने इंदिरा गांधी मेमोरियल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील तसेच डिसेंबरमध्ये जादवपूर विद्यापीठात ते व्याख्यान देणार आहेत.