शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भारताची वाटचाल बाल्कनायझेशनच्या दिशेने, प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:03 IST

भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोलकाता - भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता येथे एका मुलाखतीत भारताची वाटचाल आता बाल्कनायझेशनच्या दिशेने सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

(बाल्कनायझेशन म्हणजे काय ?- दुस-या महायुद्धानंतर युरोपातील बाल्कन प्रदेशात विविध नवे देश तयार होण्याच्या प्रक्रियेला बाल्कनायझेशन म्हणतात.)भरकटलेली अर्थव्यवस्था, मंदावलेली आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मिती होण्यास आलेले अपयश अशा गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विभाजनाच्या राजकारणाचा वापर केला जातो, याबाबत प्रणव मुखर्जी यांनी आपले मत व्यक्त केले. देशाचे तीन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, पी.चिदंबरम, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सामाजिक व राजकीय स्थितीबाबत मत व्यक्त केले आहे.

भारताच्या सध्याच्या स्थितीत आता काय केले पाहिजे?, असे विचारताच मुखर्जी यांनी हाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे, असे उत्तर दिले. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुखर्जी आपली मते व विचार जाहीर प्रकट करत राहतील असे त्यांच्या या विधानांवरुन वाटते. 14 ऑक्टोबरला प्रणव मुखर्जी अलिगड मुस्लिम विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत तर नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथे विधान ट्रस्टने इंदिरा गांधी मेमोरियल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील तसेच डिसेंबरमध्ये जादवपूर विद्यापीठात ते व्याख्यान देणार आहेत.