शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

'देशात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण पूर्ण होणार', केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:45 IST

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोरोना संकट आणि लसीकरण मोहीमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोरोना संकट आणि लसीकरण मोहीमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यासोबत जावडेकर यांनी देशातील कोरोना लसीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत देशात सर्व नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असेल असा दावा जावडेकर यांनी यावेळी केला आहे. 

"देशाचे पंतप्रधान जनतेसोबत मिळून कोरोना संकटाचा सामना करत आहेत. तर राहुल गांधी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना नौटंकी संबोधत आहेत. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे देशाचा आणि जनतेचा अपमान आहे. आम्ही अशाप्रकारच्या शब्दांचा वापर करणार नाही. कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद करुन टाकली आहे", असा जोरदार घणाघात प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. 

देशातील कोरोना लसीकरणाबाबत बोलत असताना जावडेकर यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. "डिसेंबर २०२१ पर्यंत देशात लसीकरणाची मोहीम पूर्ण होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तोपर्यंतचा २१६ कोटी लसींच्या डोसचा उत्पादनाचा रोडमॅप सादर केला आहे", असं जावडेकर म्हणाले. देशात आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्याचा प्रश्न देखील समोर आला आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून उत्पादन वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. लवकरच लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.  

 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधी