शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

प्रकाश आंबेडकर मविआचेच; जागावाटपासाठी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 06:57 IST

प्रकाश आंबेडकर यांना ३ जागा दिल्या जाऊ शकतात

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्राच्या जागावाटपाबाबत मंगळवारी दिल्लीत चर्चा केली. आजच्या चर्चेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग असेल, असा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर यांना ३ जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय दक्षिण मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागांवर बैठकीत एकमत झाले नाही.

मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. परंतु शिवसेनेचे असे मत आहे की, ही जागा दहा वर्षांपासून आपल्या ताब्यात आहे. अशा स्थितीत विद्यमान खासदाराची जागा कशी देणार? अशी त्यांची भूमिका आहे. पुण्याची जागा त्यांच्याकडे यावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. नाशिक आणि दिंडोरीतील एक जागा काँग्रेसला द्यावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे.

तोडगा न निघाल्यास...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढविल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागांवर बैठकीत एकमत झाले नाही तरी या चार जागांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी बैठक घेतील आणि त्यावर तोडगा काढतील.

लोकसभेच्या तयारीसाठी खरगे आज दिल्लीत

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विविध घटकांवर जबाबदारी सोपविण्यासाठी १० जानेवारीला बैठक बोलावण्यात आली आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी कलबुर्गी येथे सांगितले. या बैठकीसाठी बुधवारी दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाने मतदारसंघांमध्ये ५००हून अधिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उमेदवारांची निवड कशी करायची हे ठरवण्यासाठी बुधवारी कर्नाटकात बैठक होणार आहे. इतर राज्यांमध्येही अशाच बैठका होणार आहेत.

मणिपूरमध्ये भारत जोडो न्याय यात्रेला अद्याप मंजुरी नाही

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे; परंतु जिथून ही यात्रा सुरू होणार आहे, त्या मणिपूरमधील मैदानासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांची भेट घेतली तेव्हा त्यांना हे प्रकरण मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याकडे असल्याचे सांगितले.काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आठवडाभरापूर्वी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही राजकीय यात्रा नाही, त्यामुळे सरकारने याचे राजकारण करू नये. संकटग्रस्त मणिपूरमधील लोकांच्या जखमा भरून काढणे आणि द्वेष संपवून प्रेमाचा संदेश देणे हा यात्रेचा उद्देश आहे. यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी