शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रायन इंटरनॅशनल स्कूल उघडल्यानंतर प्रद्युम्नच्या वर्गात पहिल्या दिवशी फक्त चार मुलं हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:20 IST

शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली.

ठळक मुद्दे शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली.प्रद्युम्नच्या वर्गात फक्त चारच विद्यार्थी हजर होते. या चारपैकी दोन मुलं त्यांच्या पालकांना घेऊन शाळेतून नाव काढून घेण्यासाठी आले होते.

गुरगाव, दि. 18- गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षाच्या मुलाच्या हत्येला आज दहा दिवस झाले. प्रद्युम्नच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूल बंद ठेवण्यात आली होती. आज तब्बल दहा दिवसांनी शाळा पुन्हा उघडली. शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रद्युम्नच्या वर्गात फक्त चारच विद्यार्थी हजर होते. या चारपैकी दोन मुलं त्यांच्या पालकांना घेऊन शाळेतून नाव काढून घेण्यासाठी आले होते. 8 सप्टेंबर रोजी गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात प्रद्युम्नचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेच्या बसचा ड्रायव्हर अशोक कुमार याला अटक करण्यात आली होती. 

प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर आज दहा दिवसांनी शाळा सुरू झाली. सोमवारी सकाळी शाळा सुरू झाल्यापासून सकाळपासूनच विद्यार्थ्यांची संख्या शाळेत कमी दिसली. मुलांना घेऊन शाळेत आलेल्या प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता होती पण त्याचवेळी शाळेतील त्यांच्या सुरक्षेविषयी भीतीही वाटत होती. 

'प्रद्युम्नच्या हत्येनंतर माझ्या मुलाला मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्या वर्गात आणि जेथे प्रद्युम्नचा मृतदेह सापडला त्या स्वच्छतागृहात परत जाण्याच्या तो तयारीत नसल्याचं प्रद्युम्नच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितलं. तसंच शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास नसल्याने आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही, असं मतही काही पालकांनी व्यक्त केलं.

मुलांमध्ये भीतीचं वातावरणरायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी सुरू झाली. मुलांनी शाळेत हजेरी लावली. पण शाळेत आलेल्या मुलांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. शाळेत आल्यानंतर खूप भीती वाटते आहे. पण शाळा पुन्हा सुरू झाली म्हणून यावं लागलं,अशी प्रतिक्रिया मुलांकडून मिळते आहे. मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना शाळेत घेऊन आल्याचं पालकांनी सांगितलं आहे. सकाळी शाळेमध्ये आलेली एक मुलगी रडायला लागली आणि भीतीमुळे ती वर्गात बसायला तयार नव्हती. यामुळे तिचे पालक तिला पुन्हा घरी घेऊन गेले. तर काही पालकांनी आज मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलं. शाळेतील सुरक्षा व्यवस्था नीट असल्याची खात्री करूनच मुलांना शाळेत पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर शाळेत गेलेली आमची मुलं पुन्हा घरी येईपर्यंत मनात भीतीचं असेल, असं काही पालकांनी सांगितलं.

प्रद्युम्नच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजीप्रद्युम्नच्या हत्येनंतर दहा दिवसांनी शाळा सुरू केल्याच्या निर्णयावर प्रद्युम्नच्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत निर्णयाला विरोध केला आहे. जोपर्यंत हत्येचा तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत शाळा प्रशासन शाळा कशी सुरू करू शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी वरूण ठाकूर म्हणाले, या संपूर्ण घटनेत शाळेतील काही लोक सहभागी आहेत. जर शाळा पुन्हा सुरू केली तर ती लोक  पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे. 

कोर्टाने सरकारला पाठवली नोटीससुप्रीम कोर्टाने शाळेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर केद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने नोटीस जारी करत, शाळांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पाऊलं उचलली जात आहेत? असा सवाल विचारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तीन आठवड्यात यावर उत्तर देण्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

नेमकं प्रकरण काय ?गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची हत्या झाली. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून झालेल्या तपासणीत आरोपी अशोक कुमार याने गुन्ह्याची कबूली दिली.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूल