शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोदी सरकार देशवासीयांना 'शॉक' देण्याच्या तयारीत; वीज बिलात होणार वाढ? नवा नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 17:31 IST

महागाई वाढत असताना आता वीजचे दरदेखील वाढणार

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही महागाई कमी झालेली नाही. महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलेलं असताना आता आणखी एक मोठा झटका बसणार आहे. 

वीज निर्मिती करणाऱ्या देशातील कंपन्या आणि ऊर्जा वितरण करणाऱ्या कंपन्या (डिस्कॉम) आर्थिक संकटातून जात आहेत. देशातील ऊर्जा क्षेत्राची स्थिती वाईट आहे. भारत मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करतो. देशात तयार होणारी वीज मुख्यत्वे कोळशापासूनच तयार होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यास ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा खर्चदेखील वाढतो. गेल्या महिन्यात देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर ऊर्जा मंत्रालयानं ऑटोमॅटिक पास-थ्रू मॉडल संदर्भात आदेश जारी केला आहे.

ऑटोमॅटिक पास-थ्रू मॉडल अंतर्गत फ्युचर कॉन्ट्रॅक्टनंतर इंधनाचा दर वाढल्यास सरकारी डिस्कॉमवर अतिरिक्त ओझं पडेल. डिस्कॉमला ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना करारापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. यामुळे ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कारण त्यांना वाढलेल्या खर्चानुसार पैसे मिळतील. मात्र सरकारच्या निर्णयामुळे ऊर्जा वितरण कंपन्यांची स्थिती आणखी बिघडू शकते.

डिस्कॉमकडे ऊर्जेच्या वितरणाची जबाबदारी आहे. डिस्कॉम वीज पुरवठा करून त्या बदल्यात शुल्क आकारतं. इंधन दरात वाढ झाल्यास डिस्कॉम वीज खरेदी करताना ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अधिक रक्कम देईल. मात्र राजकीय दबाव आणि जनतेचा विरोध पाहता विजेचा दर वाढवणं अवघड असेल. मात्र डिस्कॉमला नाईलाजानं वीजेचा दर वाढवावा लागेल. त्याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसेल.

टॅग्स :electricityवीज