शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची शक्ती ही बॅाम्ब अन् बंदुकीच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 06:55 IST

जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी मन की बात केली आहे. जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तसेच चांद्रयान २ हे संपूर्ण देशाचे मिशन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले. त्यांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा केली. 

या कार्यक्रमात त्यांनी जम्मू- काश्मीरचा विकास, चांद्रयान 2 मिशन, पूरस्थितीबद्दलच्या विषयांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे पूर आल्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र मिळून यावर काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सांगितले की, 'बॅक टू व्हिलेज' कार्यक्रमाला आणखी रंगतदार बनविण्यासाठी इतर कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. तसेच ज्याठिकाणी पोहोचण्यासाठी पायी चालत जाण्यास एक दिवस लागतो, अशा ठिकाणी अधिकारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत पोहोचू शकतील. शोपियान, पुलवामा, कुलगाव, अनंतनाग यांसारख्या गावांमध्ये अधिकाऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचे त्यांना सांगितले. विकासाची शक्ती ही बॅाम्ब- बंदूकांच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी आहे आणि जे लोक द्वेष पसरवतात ते कधीच यशस्वी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळाचा विचार केला तर 2019 हे वर्ष देशासाठी चांगले गेले आहे. मार्च महिन्यात एसॅट लॅान्च केले होते व जुलैमध्ये चांद्रयान 2 लाँचिंग झाले.

देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेलं जाईल. प्रश्नोत्तर स्पर्धेत चांगले क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे 7 डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेलं जाईल असंही मोदींनी सांगितलं. याशिवाय क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंचही मोदींनी कौतुक केलं आणि देशासाठी सन्मानाची व अभिनामानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात