शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विकासाची शक्ती ही बॅाम्ब अन् बंदुकीच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 06:55 IST

जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी मन की बात केली आहे. जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तसेच चांद्रयान २ हे संपूर्ण देशाचे मिशन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले. त्यांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा केली. 

या कार्यक्रमात त्यांनी जम्मू- काश्मीरचा विकास, चांद्रयान 2 मिशन, पूरस्थितीबद्दलच्या विषयांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे पूर आल्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र मिळून यावर काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सांगितले की, 'बॅक टू व्हिलेज' कार्यक्रमाला आणखी रंगतदार बनविण्यासाठी इतर कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. तसेच ज्याठिकाणी पोहोचण्यासाठी पायी चालत जाण्यास एक दिवस लागतो, अशा ठिकाणी अधिकारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत पोहोचू शकतील. शोपियान, पुलवामा, कुलगाव, अनंतनाग यांसारख्या गावांमध्ये अधिकाऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचे त्यांना सांगितले. विकासाची शक्ती ही बॅाम्ब- बंदूकांच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी आहे आणि जे लोक द्वेष पसरवतात ते कधीच यशस्वी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळाचा विचार केला तर 2019 हे वर्ष देशासाठी चांगले गेले आहे. मार्च महिन्यात एसॅट लॅान्च केले होते व जुलैमध्ये चांद्रयान 2 लाँचिंग झाले.

देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेलं जाईल. प्रश्नोत्तर स्पर्धेत चांगले क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे 7 डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेलं जाईल असंही मोदींनी सांगितलं. याशिवाय क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंचही मोदींनी कौतुक केलं आणि देशासाठी सन्मानाची व अभिनामानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात