शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:55 IST

कोळसा टंचाई दूर करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: देशात उष्णतेचा कहर कायम असताना अनेक राज्यांमध्ये कोळसा संकट निर्माण झालं आहे. कोळशाची टंचाई असल्यानं वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. अनेक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आला आहे. या ठिकाणी कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि वीज निर्मिती केंद्रांमध्ये वेळेत कोळसा पोहोचावा यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये वीज संकट आहे. उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली आहे. त्यातच कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानात विजेची कमतरता आहे. त्यामुळे लोडशेडिंग सुरू झालं आहे. ऐन उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रशियाकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे कोळशापासून निर्माण होणाऱ्या वीजेवरील भार वाढला आहे. सध्या देशातील औष्णिक उर्जा केंद्रांत २१ मिलियन टन कोळसा साठा शिल्लक आहे. हा साठा १० दिवस पुरेसा आहे. 

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकट