शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:55 IST

कोळसा टंचाई दूर करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: देशात उष्णतेचा कहर कायम असताना अनेक राज्यांमध्ये कोळसा संकट निर्माण झालं आहे. कोळशाची टंचाई असल्यानं वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. अनेक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आला आहे. या ठिकाणी कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि वीज निर्मिती केंद्रांमध्ये वेळेत कोळसा पोहोचावा यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये वीज संकट आहे. उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली आहे. त्यातच कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानात विजेची कमतरता आहे. त्यामुळे लोडशेडिंग सुरू झालं आहे. ऐन उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रशियाकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे कोळशापासून निर्माण होणाऱ्या वीजेवरील भार वाढला आहे. सध्या देशातील औष्णिक उर्जा केंद्रांत २१ मिलियन टन कोळसा साठा शिल्लक आहे. हा साठा १० दिवस पुरेसा आहे. 

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकट