शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:49 IST

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. ...

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहन भागवत बोलत होते. त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये सत्याचा विजय व्हायचा असेल तर शक्ती आणि युक्ती दोहोंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराच्या प्रयत्न, त्याग आणि निष्ठेमुळे काश्मीरमध्ये भारताचे सामर्थ्य अबाधित आहे. काही उचापतखोरांना सामर्थ्याचीच भाषा कळते, असे मोहन भागवत यांनी म्हटले. 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील सर्व लोकांचा डीएनए एकच आहे. काश्मीर प्रश्नाकडे एक समस्या म्हणून बघितले जाऊ नये. अनेकजण आमची भाषा वेगळी असल्यामुळे काश्मीर स्वतंत्र करावा, अशी मागणी करतात. आपल्याला भारताच्या अखंडतेचा विसर पडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, पाकिस्तान, सियाचीन एवढेच नव्हे तर पूर्व काबूल, म्यानमारमधील चिंद्वीन नदीचा काबुलपर्यंतचा पश्चिम भाग, चीनकडील बाजूस असणारा तिबेटचा उताराचा प्रदेश आणि श्रीलंकेचा दक्षिण भाग हा सर्व अखंड भारताचा परिसर असल्याचे भागवत यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असेही भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतJammu Kashmirजम्मू-काश्मीर