शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:49 IST

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. ...

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहन भागवत बोलत होते. त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये सत्याचा विजय व्हायचा असेल तर शक्ती आणि युक्ती दोहोंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराच्या प्रयत्न, त्याग आणि निष्ठेमुळे काश्मीरमध्ये भारताचे सामर्थ्य अबाधित आहे. काही उचापतखोरांना सामर्थ्याचीच भाषा कळते, असे मोहन भागवत यांनी म्हटले. 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील सर्व लोकांचा डीएनए एकच आहे. काश्मीर प्रश्नाकडे एक समस्या म्हणून बघितले जाऊ नये. अनेकजण आमची भाषा वेगळी असल्यामुळे काश्मीर स्वतंत्र करावा, अशी मागणी करतात. आपल्याला भारताच्या अखंडतेचा विसर पडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, पाकिस्तान, सियाचीन एवढेच नव्हे तर पूर्व काबूल, म्यानमारमधील चिंद्वीन नदीचा काबुलपर्यंतचा पश्चिम भाग, चीनकडील बाजूस असणारा तिबेटचा उताराचा प्रदेश आणि श्रीलंकेचा दक्षिण भाग हा सर्व अखंड भारताचा परिसर असल्याचे भागवत यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असेही भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतJammu Kashmirजम्मू-काश्मीर