शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

गरिबी हीच सर्वांत मोठी जात; जातीनिहाय गणनेवरून पंतप्रधान मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:46 IST

विरोधी पक्षांच्या जातीनिहाय गणनेच्या मागणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विराेधी पक्षांवर घणाघाती टीका केली.

जगदलपूर (छत्तीसगड) : विरोधी पक्षांच्या जातीनिहाय गणनेच्या मागणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विराेधी पक्षांवर घणाघाती टीका केली. ‘काँग्रेसला देशातील हिंदूंमध्ये कोणत्याही किमतीत फूट पाडण्याची आणि भारताचा नाश करण्याची इच्छा आहे,’ असा आरोप करून आपल्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आहे आणि तीच सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देशाचा प्रमुख विरोधी पक्ष त्यांच्या नेत्यांऐवजी पडद्यामागील लोक देशविरोधी शक्तींशी संगनमत करून चालवत असल्याचा आरोपही केला.  भाजपच्या परिवर्तन महासंकल्प सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, कालपासून काँग्रेसने वेगळा सूर लावला आहे. जेवढी लोकसंख्या, तेवढे अधिकार द्या, असे ते म्हणतात. मी म्हणतो की या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या असेल तर ती गरिबांची आहे. गरिबांचे कल्याण हे माझे ध्येय आहे.

मुख्यमंत्र्यांवर नाराजी

बस्तरच्या नागरनार पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनासह २६ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनाला मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित  न राहिल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.

मोदींचा काँग्रेसला सवाल

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील? ते म्हणायचे की देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे आणि त्यात मुस्लिमांचाही पहिला हक्क आहे. मात्र आता कोणाला किती अधिकार मिळणार हे लोकसंख्या ठरवेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसला मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे आहेत का, अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी आता पुढे येऊन आपले सर्व हक्क घ्यावेत का?” असा सवालही पंतप्रधानांनी केला.

तेलंगणात ८००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी तेलंगणातील ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सुमारे ८००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मनोहराबाद-सिद्धीपेठ रेल्वे मार्गाचे आणि धर्माबाद आणि मनोहराबाद दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.