शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

गरिबी हीच सर्वांत मोठी जात; जातीनिहाय गणनेवरून पंतप्रधान मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:46 IST

विरोधी पक्षांच्या जातीनिहाय गणनेच्या मागणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विराेधी पक्षांवर घणाघाती टीका केली.

जगदलपूर (छत्तीसगड) : विरोधी पक्षांच्या जातीनिहाय गणनेच्या मागणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विराेधी पक्षांवर घणाघाती टीका केली. ‘काँग्रेसला देशातील हिंदूंमध्ये कोणत्याही किमतीत फूट पाडण्याची आणि भारताचा नाश करण्याची इच्छा आहे,’ असा आरोप करून आपल्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आहे आणि तीच सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देशाचा प्रमुख विरोधी पक्ष त्यांच्या नेत्यांऐवजी पडद्यामागील लोक देशविरोधी शक्तींशी संगनमत करून चालवत असल्याचा आरोपही केला.  भाजपच्या परिवर्तन महासंकल्प सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, कालपासून काँग्रेसने वेगळा सूर लावला आहे. जेवढी लोकसंख्या, तेवढे अधिकार द्या, असे ते म्हणतात. मी म्हणतो की या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या असेल तर ती गरिबांची आहे. गरिबांचे कल्याण हे माझे ध्येय आहे.

मुख्यमंत्र्यांवर नाराजी

बस्तरच्या नागरनार पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनासह २६ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनाला मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित  न राहिल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.

मोदींचा काँग्रेसला सवाल

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील? ते म्हणायचे की देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे आणि त्यात मुस्लिमांचाही पहिला हक्क आहे. मात्र आता कोणाला किती अधिकार मिळणार हे लोकसंख्या ठरवेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसला मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे आहेत का, अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी आता पुढे येऊन आपले सर्व हक्क घ्यावेत का?” असा सवालही पंतप्रधानांनी केला.

तेलंगणात ८००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी तेलंगणातील ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सुमारे ८००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मनोहराबाद-सिद्धीपेठ रेल्वे मार्गाचे आणि धर्माबाद आणि मनोहराबाद दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.