शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२१ लाख खातेदारांच्या घरी पोस्टमननी पोहचविली ४१२ कोटींची रोख रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:45 IST

जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेत एक क्रांतिकारक गोष्ट घडली आहे. एखाद्याचे खाते कोणत्याही बँकेत असो व तिची शाखा तुमच्या गावात किंवा शहरात नसली तरीदेखील जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल. या सुविधेसाठी त्या व्यक्तीचे पोस्टात खाते असणे गरजेचे नाही. अशा रितीने पोस्टाने लॉकडाऊनच्या काळात देशभरात २१ लाख खातेदारांपर्यंत ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम लोकांपर्यंत पोहोचविली आहे.खातेदारांना ही रक्कम पोस्टमननी २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत पोहोचविली. हे खातेदार मुख्यत्वे ग्रामीण भागातील व जिथे बँकांच्या फारशा शाखा नाहीत, अशा ठिकाणचे रहिवासी आहेत. पोस्टाची देशभरात १.८६ लाख कार्यालये असून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) अंतर्गत आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिमद्वारे (एइपीएस) हे पैसे खातेदारांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे, अशी माहिती पोस्ट खात्याचे सचिव प्रदीप्तकुमार बिसोई यांनी दिली आहे.>औषधे, पीपीईचाही केला पुरवठालॉकडाऊनच्या काळात औषधे, पीपीइ यासारख्या वस्तूही पोस्टामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. विषाणूविरोधातील लढ्यामध्ये पोस्ट खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा बंद असल्याने रुग्णालयांना औषधपुरवठा करण्याचे काम पोस्ट खात्याच्या वाहनांतूनही करण्यात आले. त्यामध्ये दोन लाख पोस्टमन सक्रिय भूमिका बजावत आहेत. आता लोक वीज, पाणी, डीटीएचची बिले किंवा पैशांचे अन्य बँक खात्यात हस्तांतरण आदी कामे आयपीपीबी अ‍ॅप किंवा पोस्टमनच्या मदतीने करू शकतात. त्यामुळे पेन्शनर, महिला, गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.