शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

संयमानंतरचा स्फोट अधिक घातक असू शकतो, चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात भारताला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:32 IST

भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.

सौरभ कुमारमुंबई : भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.संघर्षाच्या प्रारंभिक टप्प्यात संयम ठेवणे ही आमची संस्कृती आहे; मात्र संयमानंतरचा स्फोट हा विजेसारखा असू शकतो, असा इशारा चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात देण्यात आला आहे. भलेही चीनने ३० वर्षांत मोठे युद्ध केलेले नाही; पण अगदी अटीतटीच्या प्रसंगी प्रत्येक देश युद्धाचा पर्याय स्वीकारतो, असा इशाराही यात देण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, भारताला असे वाटते की, चीनला रस्ता तयार करण्यापासून रोखण्याचा भारताचा निर्धार हा चीनच्या निश्चयाला चिरडून टाकू शकतो. संपूर्ण चीनच्या जनतेची अशी मागणी आहे की, घुसखोरांकडून आमच्या ज्या भागावर ताबा घेण्यात आला आहे तो भाग परत घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भारतीय किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय ताकद रोखू शकत नाही. जर पीपल्स लिबरेशन आर्मीने हल्ला केला, तर भारत त्याचा राजकीय आणि आर्थिक परिणाम सहन करण्यास सक्षम राहणार नाही. अशा परिस्थितीत भारताला फायदाच होईल, असा अंदाज काही भारतीय संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत असले तरी तो एक विनोद ठरेल.भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये ७० दिवसांपासून तणाव आहे. यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या भागात सैन्य कायम राहील अशी भूमिका भारताने घेतली आहे. त्यावर भाष्य करताना या लेखात म्हटले आहे की, चीनची ताकद ओळखण्यात भारत गंभीर चूक करीत आहे. भारतीय सुरक्षा अधिकाºयांच्या हवाल्याने भारतातील मीडियाने असे वृत्त दिले आहे की, चीन युद्धाची जोखीम स्वीकारणार नाही. छोट्या संघर्षालाही चीन घाबरतो, पण वेळ आली, तर प्रत्येक देश युद्धासाठी तयार असतो, असेही यात म्हटले आहे.

(लेखक निवृत्त आयएफएस अधिकारी असून त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्ना येथील कार्यालयात राजदूत म्हणून काम केलेले आहे. बंगळुरुच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’मध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीSushma Swarajसुषमा स्वराज