शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:50 IST

दहशतवाद्यांकडून आणखी टार्गेट किलिंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.

श्रीनगर - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क आहे. त्यातच गुप्तचर विभागाकडून आणखी एक रिपोर्ट आला आहे. त्यात पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या द रेजिस्टेंट फॉर्स या दहशतवादी संघटनेकडून आणखी हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काश्मीरातील ५० पर्यटनेस्थळे बंद करण्यात आली आहे. जर भारताने पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई केली तर तणावपूर्ण वातावरणात पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली जाऊ शकते. सध्या संवेदनशील भागात सुरक्षा जवान तैनात आहेत. त्याशिवाय अनेक तपास यंत्रणाही अलर्टवर आहेत. 

काश्मीरमध्ये तैनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फोर्सकडून आणखी टार्गेट किलिंग केली जाऊ शकते. त्यात काश्मिरी पंडित, स्थलांतरित कामगार आणि सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा एका स्थानिक दहशतवाद्याचे घर उद्ध्वस्त केले तेव्हा दहशतवादी संघटनेकडून एक व्हिडिओ जारी केला होता. जर बुलडोझर एक्शन अशीच सुरू राहिली तर हल्लेही सुरू राहतील. त्यामुळे दहशतवाद्यांकडून आणखी टार्गेट किलिंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.

तर २०१९ मध्ये जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवले होते तेव्हापासून पंचायत ते विधानसभा निवडणुकीपर्यंत काश्मीरात शांतता होती. पर्यटकांचीही गर्दी वाढली. स्थानिकांना रोजगार मिळाला. वंदे भारत श्रीनगरपर्यंत पोहचली. ज्याप्रकारे पाकिस्तानात अंतर्गत कलह सुरू आहे आणि दुसरीकडे काश्मीरात वातावरण सुधारत चालले आहे. त्यामुळेच काश्मीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी टार्गेट किलिंग करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला असं जेएनयूचे आंतरराष्ट्रीय विभागाचे प्राध्यापक संदीप कुमार सिंह यांनी सांगितले.

आता पाकिस्तानची खैर नाही

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती, सुरक्षा दलांची कारवाई आणि भविष्यातील रणनीती, यावर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि लष्कराला कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. "दहशतवादाला योग्य उत्तर दिले जाईल. हल्ल्याचे लक्ष्य आणि वेळ सैन्याने ठरवावी" याशिवाय, अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री करण्यासही पंतप्रधानांनी सांगितले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी