शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

दशकभरात देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांची वाढ

By admin | Updated: January 22, 2015 14:34 IST

देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २००१ साली मुस्लिमांची लोकसंख्या १३.४ टक्के होती ती वाढून २०११ मध्ये १४.२ टक्के इतकी झाली. राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर आजही अधिक असला तरी नव्वदच्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. १९९१ ते २००१ या काळात मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता, मात्र आता तो २४ टक्क्यांवर आला आहे. 
आसाम व त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांच्या संख्येत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये ३०.९ टक्के इतके मुस्लिम होते, मात्र दशकभरानंतर २०११ साली तोच आकडा ३४. २ टक्के इतका झाला. तर बांग्लादेशमधून होणा-या घुसखोरीमुळे नागरिकांमुळे पश्चिम बंगालमधील मुस्लिमांची संख्या २५.२ टक्क्यांवरून २७ टक्के झाली आहे. 
उत्तराखंडमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत तब्बल २ टक्के वाढ दिसून आली. राज्यात २००१ साली ११.९ टक्के नागरिक होते तोच आकडा २०११ साली १३.९ टक्के इतका होता. 
केरळमध्ये २००१ साली २४.७ मुस्लिम होते, २०११ साली तीच आकडेवारी २६.६ टक्के इतकी होती., तर गोव्यात २००१ साली ६.८ टक्के मुस्लिम होते, २०११ साली तो आकडा ८.४ टक्के इतका होता. जम्मू काश्मीरमधील लोकसंख्या दशकभरात ६७ टक्क्यांवरून ६८. ३ टक्क्यांवर तर हरियातील लोकसंख्या ५.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणि दिल्लीतील मुस्लिमांची लोकसंख्या ११.७ टक्क्यांवरून १२.९ टक्के इतकी झाली