शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

दशकभरात देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांची वाढ

By admin | Updated: January 22, 2015 14:34 IST

देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २००१ साली मुस्लिमांची लोकसंख्या १३.४ टक्के होती ती वाढून २०११ मध्ये १४.२ टक्के इतकी झाली. राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर आजही अधिक असला तरी नव्वदच्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. १९९१ ते २००१ या काळात मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता, मात्र आता तो २४ टक्क्यांवर आला आहे. 
आसाम व त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांच्या संख्येत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये ३०.९ टक्के इतके मुस्लिम होते, मात्र दशकभरानंतर २०११ साली तोच आकडा ३४. २ टक्के इतका झाला. तर बांग्लादेशमधून होणा-या घुसखोरीमुळे नागरिकांमुळे पश्चिम बंगालमधील मुस्लिमांची संख्या २५.२ टक्क्यांवरून २७ टक्के झाली आहे. 
उत्तराखंडमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत तब्बल २ टक्के वाढ दिसून आली. राज्यात २००१ साली ११.९ टक्के नागरिक होते तोच आकडा २०११ साली १३.९ टक्के इतका होता. 
केरळमध्ये २००१ साली २४.७ मुस्लिम होते, २०११ साली तीच आकडेवारी २६.६ टक्के इतकी होती., तर गोव्यात २००१ साली ६.८ टक्के मुस्लिम होते, २०११ साली तो आकडा ८.४ टक्के इतका होता. जम्मू काश्मीरमधील लोकसंख्या दशकभरात ६७ टक्क्यांवरून ६८. ३ टक्क्यांवर तर हरियातील लोकसंख्या ५.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणि दिल्लीतील मुस्लिमांची लोकसंख्या ११.७ टक्क्यांवरून १२.९ टक्के इतकी झाली