शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार नाही; सीपीएम खासदाराच्या प्रश्नावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 05:48 IST

वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने राज्यसभेत स्पष्ट केले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याबाबत सरकार विचार करीत नाही.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या चर्चेदरम्यान मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत स्पष्ट केले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याबाबत सरकार विचार करीत नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात उपरोक्त माहिती दिली. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे; परंतु, यासंदर्भात कोणताही कायदा करण्याचा विचार नाही, असे भारती पवार यांनी स्पष्ट केले.

भारत सरकारचा निर्णय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० आणि राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या (२०१७) तत्त्वाने निर्देशित आहे. २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यासोबत कुटुंब नियोजनातील राहून गेलेल्या आवश्यक बाबी पूर्ण करणे, हे सरकारचे लक्ष्य आहे. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.

२०१९-२१ राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार एकूण प्रजनन दर कमी होऊन २.० राहिला. हे जन्म-मृत्यूच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी ३१ राज्यांनी प्रतिस्थापन प्रमाणाची प्रजनन क्षमता प्राप्त केली आहे. 

गर्भनिरोधक वापरण्याचे प्रमाण वाढून ५६.५% झाले आहे. कुटुंब नियोजनातील अपूर्ण आवश्यकतेच्या फक्त ९.४% आहे. २०१९ मध्ये ढोबळ जन्म दर (सीबीआर) कमी होऊन १९.७वर आला. त्यामुळे सरकार कोणत्याही कायदेशीर उपायावर विचार करीत नाही. - भारती पवार, केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनCentral Governmentकेंद्र सरकार