शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची दयनीय अवस्था

By admin | Updated: November 5, 2015 23:29 IST

जळगाव- जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी मदत शेतकर्‍यांना मिळते. कपाशीचा हमीभावही फसवा आहे. हा जिल्हा कृषि व महसूलमंत्र्यांचा आहे, पण शेतकर्‍यांची अवस्था बिकट, दयनीय असल्याचे आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी शहरात आत्महत्यग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

जळगाव- जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी मदत शेतकर्‍यांना मिळते. कपाशीचा हमीभावही फसवा आहे. हा जिल्हा कृषि व महसूलमंत्र्यांचा आहे, पण शेतकर्‍यांची अवस्था बिकट, दयनीय असल्याचे आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी शहरात आत्महत्यग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
शिवकॉलनी येथील हनुमान मंदिरात हा कार्यक्रम सायंकाळी झाला. शिवकॉलनी परिसर बहुउद्देशीय संस्थेने आयोजन केले होते. व्यासपीठावर महापौर राखी सोनवणे , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे, ग.स.चे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संचालक मनोज पाटील, आर.बी.पाटील आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगरला झुकते माप
खरीप पीक विमा योजनेत मुक्ताईनगरातील शेतकर्‍यांना मोठी मदत मिळते. पण इतर तालुक्यांंमध्ये ६००, ७०० रुपये मदत मिळत आहे. केळी उत्पादकांनी पीक विमा काढला होता. पण विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शासनाने त्याबाबतचे आपल्या वाट्याचे पैसेच संबंधित कंपनीकडे भरलेले नाहीत. यामुळे केळी उत्पादक विमा घेण्यास पात्र असताना त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. कृषिमंत्री जिल्ह्यात आहेत, परंतु अशी परिस्थिती आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.
शेतकरी आत्महत्या दारूच्या कारणाने बेदखल
शेतकरी आत्महत्येची निम्मेपेक्षा अधिक प्रकरणे दारूचे कारण सांगून रद्द केली. असे असेल तर प्रथम दारूची दुकाने बंद करा, मग असे निर्णय घ्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
धरणगावात अनेक पदे रिक्त
धरणगावात वर्षभरापासून तहसीलदार नाही. कृषि सहायकांची ११ पदे रिक्त आहेत. कामे करताना अडचणी येतात. महसूलमंत्री आपल्या जिल्ह्यात असताना ही स्थिती आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

मी शेतकर्‍यांचा वकील
माझे बापजादे शेतकरी होते. आता सरकार कारखानदारांची बाजू घेते. शेतीसाठी स्वतंत्र बजेट हवे. शेतकर्‍यांना निवृत्ती वेतन दिले जावे. मी या मागण्या सरकारमध्ये असलो तरी करीत राहीन, मला शेतकर्‍यांनी निवडून दिल्याने त्यांची वकीली करणे, त्यांचे प्रश्न मांडणे माझे कर्तव्य आहे. मी उगीच टिका करीत नाही, असेही आमदार पाटील म्हणाले.