शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"गरिब मुस्लिमांना 'टार्गेट' केलं जातं, खरे गुन्हेगार बंदूक घेऊन..."; ओवेसींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:54 IST

नूंह मधील बुलडोझर कारवाईवरून असदुद्दीन ओवेसींनी केलं बोचरं ट्विट

Asaduddin Owaisi On Nuh Violence: एमआयएम (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हरियाणातील नूह येथील हिंसाचाराच्या आरोपींवर खट्टर सरकारने केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे भलतेच संतापले. ओवेसी यांनी ट्विट करून कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ओवेसी म्हणाले की, हरियाणात गरिबांना बेघर केले जात आहे. गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. यावेळी ओवेसी यांनी कायदेशीर प्रक्रियेचाही उल्लेख केला. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई केली जात असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच, एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी ट्विट केले की, 'सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणतीही बुलडोझर कारवाई करण्यापूर्वी सरकारला कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. इमारत मालकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येत नाही. केवळ आरोपांच्या आधारे शेकडो गरीब कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे. संघ विचारसरणीचे नेतेमंडळी जरी आपल्या तोडफोडीच्या राजकारणाचा अभिमान बाळगत असले तरी ते कायद्याने योग्य नाही आणि मानवतेच्या दृष्टीने इतरांवर अन्याय करणारेही आहे."

"हरियाणात गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य करून एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार बंदुका घेऊन मोकाट फिरत आहेत. खट्टर सरकारने देखील गुन्हेगारांपुढे गुडघे टेकले आहेत. मातीची घरे आणि झोपडपट्ट्या पाडून स्वतःला मजबूत समजणे ही मोठी गोष्ट आहे का?" असा रोखठोक सवाल ओवेसींना केला.

प्रशासनाचा युक्तिवाद

प्रशासन केवळ मुस्लिमांची घरे पाडत आहे, तर इतर आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप असदुद्दीन ओवेसींनी केला. त्यावर हरियाणाच्या प्रशासनाचा दावा आहे की जी घरे आणि दुकाने पाडण्यात आली, ती सर्व घरे आणि दुकाने आरोपींच्या नावावर आहेत, असे नाही.

नूह हिंसाचार सुनियोजित होता?

सूत्रांच्या हवाल्याने, नासिर आणि जुनैद यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नूह हिंसाचाराची योजना तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. हा प्रश्न निर्माण होत आहे कारण हिंसाचारातील 8 आरोपींना राजस्थानच्या त्या भागातून अटक करण्यात आली आहे जिथे नसीर आणि जुनैदचे संबंध होते आणि हे सर्व क्षेत्र नूहपासून फक्त 50 किमीच्या परिघात येतात.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHaryanaहरयाणाMuslimमुस्लीम