शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गरीब बिहारी कोरोना लसीच्या लोभात पडले, काँग्रेस नेत्यास पराभव पचनी पडेना 

By महेश गलांडे | Updated: November 10, 2020 16:54 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हळूहळू स्पष्ट होत आहे. बॅलेट मशीन जशजशा उघडत आहेत आणि त्यातील मतदारांचा कौल जसजसा समोर ते आहे तसतसं महाआघाडीच्या गोटातील चिंता वाढत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीने स्पष्ट बहुमातचा आकडा पार करणारी आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडीला 100 च्या आसपास जागांवर यश मिळाले आहे. मात्र, महाआघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून काँग्रेस नेत्यांना हा पराभव पचनी पडत नसल्याचे दिसून येते. 

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 तर डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवत होते. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये 144 जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला 65 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर 29 जागा लढवणाऱ्या डाव्या पक्षांनी 18 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर 70 जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचा हा पराभवाच्या दिशेने होत असलेला प्रवास पाहता काँग्रेस नेत्यांचा संयम सुटत आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेत्या आणि काँग्रेसच्या तक्रार सेलच्या अध्यक्षा अर्चना दालमिया यांनी नागिरकांना लोभी असं म्हटलं आहे. कोरोना लसीच्या लोभापायीच नागरिकांना मतदान केल्याचं दिसून येतंय, असं ट्विट अर्चना यांनी केलं आहे. 

बिहारी नागरिकांनो तुम्ही पुन्हा एकदा जुमलेबाजीत अडकला आहात, 15 लाख नाही तर कोविडची लस तरी टोचून घेऊयात. पण, मोफत लस मिळाली तर आम्हीही बिहारला येऊन लस टोचून घेऊ, असेही ट्विट अर्चना मालविया यांनी केलं आहे. दालमिया यांच्या ट्विटला अनेकांनी रिप्लाय देत त्यांच्यावर टीकाही केली आहे. 

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 128 जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा 74, जेडीयू 48, हम 2 आणि व्हीआयपी 5 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याjaipur-pcजयपूर