शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

गरीब बिहारी कोरोना लसीच्या लोभात पडले, काँग्रेस नेत्यास पराभव पचनी पडेना 

By महेश गलांडे | Updated: November 10, 2020 16:54 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हळूहळू स्पष्ट होत आहे. बॅलेट मशीन जशजशा उघडत आहेत आणि त्यातील मतदारांचा कौल जसजसा समोर ते आहे तसतसं महाआघाडीच्या गोटातील चिंता वाढत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीने स्पष्ट बहुमातचा आकडा पार करणारी आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडीला 100 च्या आसपास जागांवर यश मिळाले आहे. मात्र, महाआघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून काँग्रेस नेत्यांना हा पराभव पचनी पडत नसल्याचे दिसून येते. 

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 तर डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवत होते. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये 144 जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला 65 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर 29 जागा लढवणाऱ्या डाव्या पक्षांनी 18 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर 70 जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचा हा पराभवाच्या दिशेने होत असलेला प्रवास पाहता काँग्रेस नेत्यांचा संयम सुटत आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेत्या आणि काँग्रेसच्या तक्रार सेलच्या अध्यक्षा अर्चना दालमिया यांनी नागिरकांना लोभी असं म्हटलं आहे. कोरोना लसीच्या लोभापायीच नागरिकांना मतदान केल्याचं दिसून येतंय, असं ट्विट अर्चना यांनी केलं आहे. 

बिहारी नागरिकांनो तुम्ही पुन्हा एकदा जुमलेबाजीत अडकला आहात, 15 लाख नाही तर कोविडची लस तरी टोचून घेऊयात. पण, मोफत लस मिळाली तर आम्हीही बिहारला येऊन लस टोचून घेऊ, असेही ट्विट अर्चना मालविया यांनी केलं आहे. दालमिया यांच्या ट्विटला अनेकांनी रिप्लाय देत त्यांच्यावर टीकाही केली आहे. 

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 128 जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा 74, जेडीयू 48, हम 2 आणि व्हीआयपी 5 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याjaipur-pcजयपूर