शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीला प्रदुषणाचा विळखा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:52 IST

धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात खूपच वाढ झाली असून शुक्रवारी चौथ्या दिवशीही त्याची पातळी कमी झाली नाही. वेगवान वाऱ्यांमुळे हे वायूप्रदुषण आपोआप कमी होईल असे सांगण्यात आले.

नवी दिल्ली : धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात खूपच वाढ झाली असून शुक्रवारी चौथ्या दिवशीही त्याची पातळी कमी झाली नाही. वेगवान वाऱ्यांमुळे हे वायूप्रदुषण आपोआप कमी होईल असे सांगण्यात आले. या प्रदुषणामुळे दिल्ली व राजधानी क्षेत्रात सर्व बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे.राजधानीत वायूप्रदुषणाचे प्रमाण पीएम१० एककानूसार ७५४ व दिल्ली शहरामध्ये ते ८०१ इतके नोंदले गेले आहे. सर्वात धोकादायक पातळीपेक्षा कितीतरी पट अधिक प्रमाणात दिल्लीमध्ये वायूप्रदुषण वाढले असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळामुळे दिल्लीमध्ये वायूप्रदुषण खूप वाढले आहे. या नैैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक दोन दिवसांत वायूप्रदुषण कमी होईल असा अंदाज आहे.सफर या संस्थेतील हवामानतज्ज्ञ गुरफान बेग म्हणाले की, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे येत्या एक-दोन दिवसांत ताशी २५ ते ३५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेले वायूप्रदुषण कमी होईल. धुसर वातावरणामुळे दिल्लीतील सर्व बांधकामे रविवारपर्यंत थांबविण्याचा आदेश नायब राज्यपाल अनिल बैैजल यांनी गुरुवारी दिला होता.वाहतुकीवर परिणामपंजाब व हरयाणामध्ये तिसºया दिवशीही वातावरणात धुळीचे आच्छादन पसरलेले होते. त्यामुळे चंदीगढमध्ये हवाई वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. धूसर वातावरणामुळे चंदीगढहून ३० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. हरयाणा व पंजाबमध्ये शनिवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वायूप्रदुषणाची पातळी अनेक पटीने वाढल्याने श्वसनविकारांचा त्रास होण्याची शक्यताही वाढते. त्यादृष्टीने लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे हरयाणा सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीpollutionप्रदूषण