लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: वाढते प्रदूषण ही आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही तर ती आता एक राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी झाली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणे गरजेचे असून, केंद्राने ठोस पावले उचलण्याची गरज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्याची मागणी रविवारी गांधी यांनी केली.
प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत भारतीय नागरिकांनी हजारो संदेश पाठवले आहेत. त्यात विशेषत: मुले, वृद्ध आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबतची चिंता ठळकपणे पुढे येत आहे. भारतीय नागरिकांना केवळ पोकळ आश्वासने किंवा अहवाल नको आहेत. त्यांना स्वच्छ हवा हवी असल्याचे फेसबुक या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी नमूद केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत आठवड्यातही राहुल गांधींनी साेशल मीडियाद्वारे वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, या समस्येमुळे लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक फटका बसत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
Web Summary : Rahul Gandhi calls rising pollution a national health emergency, urging parliamentary discussion and concrete central action. He demanded resource allocation in the budget, citing citizens' concerns, especially for children and the elderly, emphasizing the need for clean air, not empty promises.
Web Summary : राहुल गांधी ने बढ़ते प्रदूषण को राष्ट्रीय स्वास्थ्य आपातकाल बताया, संसदीय चर्चा और ठोस केंद्रीय कार्रवाई का आग्रह किया। उन्होंने बजट में संसाधन आवंटन की मांग की, नागरिकों की चिंताओं, विशेष रूप से बच्चों और बुजुर्गों के लिए, स्वच्छ हवा की आवश्यकता पर जोर दिया।