शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

pollution : गुडगाव ठरले भारतातील सर्वात प्रदूषित शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:55 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे.

गुडगाव - वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, गुरगाव हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या 62 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासली त्यामध्ये गुरगावमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्यासे समोर आले. रविवारी येथे एअर क्वालिटी इंडेक्स 321 एवढा मापण्यात आला. हवा प्रदूषणाची ही सर्वात धोकादायक पातळी मानली जाते. दिल्ली-एनसीआरमधील अन्य प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथेही हवेची पातळी खराब असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे अधिकाऱ्यांनी गुडगांवमधील हवा प्रदूषित होण्यामागे अरब द्विपकल्पात आलेले धुळीचे वादळ कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. मात्र जबाबदार प्राधिकरणांकडून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान (जीआरएपी) ची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा पर्यावरणवादी करत आहेत.   सीपीसीबीच्या एअर लॅब डिव्हिजनचे माजी प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गुडगावला बसला आहे. गुडगाव दिल्लीच्या पश्चिमेस असल्याने आणि धुळीचे कण वायव्येकडून येत असल्याने गुडगावमधील हवा प्रदूषित झाली आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्येही आर्द्रतेचा स्तर जास्त आहे. त्यामुळे धुलीकण हवेतील ओलाव्याला चिकटत आहेत. आता जोपर्यंत मुसळधार पाऊस पडत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. मात्र हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही."  

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतnewsबातम्या