शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रेड झोनची चाहूल: दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वत्र प्रदूषण; वायू गुणवत्ता निर्देशांक ‘रोगट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 00:15 IST

राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशात काडी-कचरा जाळल्याने धुरांचे लोट हवेत

विकास झाडे नवी दिल्ली : आठवडापूर्वी-दिल्ली एनसीआरमध्ये असलेली स्वच्छ हवा आता नाहीशी झाली आहे. दिल्लीत आज कॅनॉटप्लेस आणि गाझिपूर हा भाग वगळता सर्वत्र रोगट हवा होती. वायु गुणवत्ता निर्देशांकात लोकांच्या आरोग्यास हानिकारक हवा असल्याचे नोंदविण्यात आले आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अजय नागपुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक आता रेडझोनमध्ये येण्याची ही चाहुल आहे.

दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या कॅनॉटप्लेस परिसरातील हवा अत्यंत स्वच्छ नोंदविण्यात आली. परंतु त्यालगतच्या ल्युटीयन्स झोन, संसद, राष्ट्रपती भवन, विविध देशांचे दुतावास असलेल्या परिसरातील वायु निर्देशांक हा आरोग्यास हानिकारक १२५ ते २०० पर्यंत नोंदविण्यात आला. आज सर्वाधिक प्रदूषित नोएडा सेक्टर १९८ ठरले. येथील वायू गुणवत्ता निर्देशांक १९८ होता. केंद्र आणि राज्य सरकारने पराळी आणि शेतातील तण जाळू नका अशा शेतकऱ्यांना सूचना दिल्या असल्या तरी, पराळी व कचरा मोठ्या प्रमाणात जाळायला सुरुवात झाली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील काही भागामध्ये पराळी जाळल्याने धुरांचे लोट हवेत पसरत आहेत. याचा परिणाम दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांच्या आरोग्यावर होत आहे. एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचे प्रदूषण जीवघेणे ठरणार आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील शेतांमध्ये ‘पुसा डी-कंपोजर’ची फवारणी करायला सुरुवात केली आहे. परंतु इतर राज्यात अशी धडक मोहिम राबविण्यात आली नाही.दिल्लीत पराळी हेच प्रदूषणाचे एकमेव कारण नाही तर कोरोनामुळे लोकांनी खासगी वाहनांस प्राधान्य दिले आहे. वाहनांमुळे रोगट हवेत भर पडत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीसह एनसीआर परिसरातील १० वर्ष जुन्या डिझल गाड्यांसह १५ वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी आणली आहे. वाहतूक विभागाने वाहनांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. त्यात कार चालवण्यापुर्वी कारला हवा ‘वार्मअप’ करणे, चाकात हवेचा दाब योग्य ठेवणे, सिग्नलवर इंजिन बंद करावे, वेळोवेळी कारची सर्व्हिसिंग करण आणि इंधनांची गुणवत्ता तपासणे.

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण