शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

देशातील ३0३ मतदारसंघांमध्ये पूर्ण झाले मतदान; ईव्हीएमविषयी सर्वत्र तक्रारी, बंगालमध्ये हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:26 IST

तिसऱ्या टप्प्यात बड्या नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद; केरळमध्ये मतदानाच्या रांगेत चार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदानाच्या वेळी प्रत्येक राज्यात ईव्हीएमविषयीच्या तक्रारी आल्या, तर केरळात व्हीव्हीपॅटमधून साप निघाल्याने कर्मचारी व मतदारांची धावपळ झाली. केरळातच मतदानाच्या रांगेत चौघांचा मृत्यू झाला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मारामारी झाली. त्यात गावठी बॉम्ब फेकण्यात आला आणि हाणामारीत एका मतदाराचा मृत्यू झाला. पण अशा स्थितीतही ११७ मतदारसंघांतील तब्बल ६६ टक्के लोकांनी मतदान केले.आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत मिळून लोकसभेच्या निम्म्याहून अधिक म्हणजे ३0३ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. यापुढील चार टप्प्यांत २४0 मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उरलेल्या १८ मतदारसंघांमध्येही २९ एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यातील ३0 मतदारसंघांत दोन टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष अमित शहा, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह व अखिलेश यादव, शरद यादव, मुख्तार अब्बास नकवी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर आदींनी मतदान केले.अमित शहा, मुलायम सिंह, मेहबुबा मुफ्ती, थरुर आदींचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. नवीन पटनायक, पी. विजयन, विजय रूपाणी आदी मुख्यमंत्र्यांनीही आज मतदान केले. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या पाच राज्यांतील सर्व मतदानसंघांतील मतदान आता पूर्ण झाले आहे.गोवा, पश्चिम बंगाल, आसाम व त्रिपुरा या चार राज्यांत ८0 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कमी मतदान झाले. कडक उन्हाचाही परिणाम काही राज्यांत झाला. मतदानाच्या वेळी मंगळुरूमध्ये जोरदार पाऊ स सुरू झाल्याने मतदारांची एकच तारांबळ उडाली. पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यांत मतदान यंत्रांविषयी असंख्य तक्रारी आल्या. जवळपास सर्वच राज्यांमध्ये मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी ती बदलावी लागली. परिणामी मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अर्थातच मतदान यंत्रे बिघडल्याचा इन्कार केला. समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांनीच नव्हे, तर काही ठिकाणी भाजपतर्फेही काही ठिकाणी यंत्रांविषयी तक्रारी करण्यात आल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक