शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पायऱ्यांवर आणि बागेत बसून हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 10:41 IST

बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे.

ठळक मुद्देबिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे.बिहारच्या रामलखन महाविद्यालयात हा प्रकार घडला. रामलखन महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागाच मिळाली नव्हती.

पाटणा - बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे. काही विद्यार्थी पायऱ्यांवर बसून उत्तरपत्रिका लिहीत आहेत तर काही जण महाविद्यालयाच्या बागेत एकमेकांशेजारी बसून उत्तरपत्रिका सोडवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या रामलखन महाविद्यालयात हा प्रकार घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामलखन महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागाच मिळाली नव्हती. त्यामुळे आपल्या परीक्षा केंद्रात, महाविद्यालयात विद्यार्थी पोहोचले तेव्हा त्यांना जिथे जागा मिळेल तिथे बसून उत्तरपत्रिका लिहा असे सांगण्यात आले होते. महाविद्यालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं अधीक्षकांनी सांगितलं आहे. 

रामलखन महाविद्यालयाची परीक्षा केंद्रासाठीची क्षमता ही अडीच हजार विद्यार्थी बसतील इतकीच आहे. पण येथे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे जिथे बसायला जागा मिळेल तिथूनच उत्तरपत्रिका लिहिण्याखेरीज विद्यार्थ्यांना पर्याय नव्हता असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात देखील असाच एक अजब प्रकार समोर आला होता. पूर्वविद्यापीठ परीक्षेदरम्यान जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कार्डबॉक्स ठेऊन परीक्षा द्यावी लागली. हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली होती. 

हावेरी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी डीडीपीआयला या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं होतं. कॉपी रोखण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जातं. कॉलेजमध्ये परीक्षा देणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली होती. हे विद्यार्थी अर्थशास्त्र आणि रसायन विज्ञानाचा पेपर देत होते. तसेच या कार्डबॉक्सला मुलांना लिहिण्यासाठी दिसावं आणि श्वास घेता यावं एवढं कापण्यात आलं होतं. या कार्डबॉक्समुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूला बघता येणं शक्य नव्हतं. मात्र अशाप्रकारे विद्यार्थ्यांसोबत प्रकार घडल्याने राज्यात विरोधकांनी आवाज उठविला. मुलांसोबत केलं जाणारं कृत्य अयोग्य आहे याबाबत योग्य ती कारवाई करू असं आश्वासन शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिलं होतं.

 

टॅग्स :BiharबिहारStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयexamपरीक्षा