शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

तरुणाईला बॉलिवूडची कोडी सोडवण्यात रस; त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष- चेतन भगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 19:08 IST

देशातील जनतेलाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल, तर राजकारणी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?; भगत यांचा सवाल

देश सध्या अतिशय मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र या संकटाकडे देशातील तरुणांचं लक्ष नाही. नागरिकांनी अशाच प्रकारे देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लत्र केल्यास देशाची अवस्था आणखी बिकट होईल, असं मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि त्याकडे जनतेचं होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली.'देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नसल्याचं सरकारला माहीत असतं. त्यामुळेच सरकारदेखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करत नाहीत. लोकच ढासळलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत नसतील. त्यांनाच काळजी नसेल, तर मग राजकारणी तरी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?,' असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीवरही चेतन भगत यांनी भाष्य केलं. 'पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एक तर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल,' असं भगत म्हणाले.चेतन भगत यांनी नुकतंच एका स्तंभामध्ये देशातील सध्याच्या आर्थिक संकटाबाबत लिहिलं होतं. जर या परिस्थितीवर तोडगा काढला गेला नाही, तर सर्वसामान्य जनता आणखी गरीब होत जाईल, असं भगत यांनी म्हटलं. तरुणांनी आता आपल्या मोबाईल फोनकडे पाहणं थांबवायला हवं आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोलायला हवं. सध्याच्या क्षणाला भारतीय तरुण त्यांच्या अवतीभवती काय घडतंय याकडे दुर्लक्ष करत आहेत,' असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला होता.

टॅग्स :Chetan Bhagatचेतन भगतcorona virusकोरोना वायरस बातम्या