शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 15:16 IST

मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरु आहेत. त्यातच, काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.

पणजी - मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरु आहेत. त्यातच, काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. कारण, 2017 च्या निवडणुकांत काँग्रेस हा 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता. इतर पक्षांनी 10 जागेवर आपले उमेदवार विजयी केले आहेत.

गोव्यातील काँग्रस आमदारांचे गटनेते सी कावेलकर यांच्या म्हणण्यानुसार, गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे गरजेचे होते. तर, सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करत असल्याचे कावेलकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये व एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे म्हणणो जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा मुख्यमंत्री  हा भाजपमधूनच निवडला जावा असे वाटते, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण बाहेरून जो नेता येईल, त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावे असा मुद्दा मांडत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपण प्रसंगी राजीनामा देण्यास तयार आहोत हे सांगितले आहे.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर